Wednesday, 1 August 2012

वर्धा जिल्‍ह्यात 37(1) व 3 कलम जारी



      वर्धा, दि. 1- जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी  शेखर चन्‍ने यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व 3 जारी केले आहे.
      या कलमाचा अंमल दि. 11 ऑगस्‍ट 2012 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.
                                                            0000000

No comments:

Post a Comment