Monday, 30 July 2012

गुणवंत गरीब विद्यार्थ्‍यांना समाजाने मदत करावी - संजय देवतळे


वर्धा दि.30- स्‍पर्धेच्‍या युगात समाजातील गरीब विद्यार्थी उच्‍च शिक्षणापासून वंचित राहू नये त्‍या विद्यार्थ्‍यांना भविष्‍यात शिक्षण सेवे विविध  क्षेत्रामध्‍ये महत्‍वाची कामगिरी बजावता यावी यासाठी गुणवंत  गरीब व होतकरु विद्यार्थ्‍यांना समाजाने मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन पर्यावरण व सांस्‍कृती विभागाचे मंत्री संजय देवतळे यांनी केले आहे.
हिंगणघाट येथे निखाडे सभागृहात काल खैरी कुणबी समाजाच्‍या वतीने समाज भूषण पुरस्‍कार जेष्‍ठ नागरीक व 10 वी व 12 विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार व गुण गौरव पर्यावरण मंत्री देवतळे यांचे हस्‍ते संपन्‍न झाला त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी  रमेशचंद्र बोमाटे हे होते तर प्रमुख पाहुने म्‍हणून आमदार सुभाष थोटे, जिल्‍हा परिषदेचे सभापती प्रा. उषाकिरण थुटे प्रबोधनकार भाऊसाहेब थुटे, माजी आमदार देवराव लडके माजी जि.प.अध्‍यक्ष कलावतीबाई वाकोडकर आदी मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
            शिक्षण व विविध क्षेत्रामध्‍ये मोठया प्रमाणावर स्‍पर्धा निर्माण झाली असून प्रतिष्‍ठीत नागरीकांनी त्‍या विद्यार्थ्‍यांचे उज्‍वल  भविष्‍य घडविण्‍याचा प्रयत्‍न करावा असे सांगून  पर्यावरण मंत्री देवतळे म्‍हणाले की, गेल्‍या दोन वर्षापासून खैरे कुणबी समाजाच्‍या वतीने समाज भूषण पुरस्‍कार, जेष्‍ठ नागरिक व 10 वी  12 वी च्‍या विद्यार्थ्‍यांनी मिळविलेल्‍या उल्‍लेखनिय यशाबाबत गुण गौरव केला जातो ही बाब गौरवरस्‍पद अशीच आहे.या कार्यक्रमातून जेष्‍ठ नागरीकांनी केलेली उल्‍लेखनिय कामगिरी नव्‍या पिढीला माहिती होणार असून त्‍यांनी केलेल्‍या कार्याची प्रेरणा सुध्‍दा मिळत असते. हिंगणघाट, समुद्रपूर व वरोरा गावामध्‍ये हा समाज सधन समजल्‍या जातो. त्‍या कारनाने हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यामध्‍ये समाजाच्‍या वतीने उकृष्‍ट असे सभागृहाची निर्मिती  करण्‍यात यावी.सभागृहामध्‍ये सामाजिक विषयाची चर्चा व अडिअडचणीवर चर्चा करुन समाजाला  योग्‍य दिशादर्शक मार्ग मिळत असतो. होतकरु व गरीब विद्यार्थ्‍यासाठी स्‍पर्धात्‍मक परिक्षेचे वर्ग चालवून त्‍यांचे उज्‍वल भविष्‍य घडविण्‍याचा प्रयत्‍न करावा असेही ते म्‍हणाले.
यावेळी बोलतांना आमदार धोटे म्‍हणाले की कृषी क्षेत्रावर हा समाज विसंबून असल्‍यामुळे अनेकांना गरीबीचा सक्ष्‍मता करावा लागतो.या समाजाच्‍या उन्‍नतीसाठी सामुहिकरित्‍या प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे.या क्षेत्रामध्‍ये अनेक शैक्षणिक संस्‍थावर समाजाचे वर्चस्‍व आहे. त्‍या संस्‍थाचालकांनी  शैक्षणिक क्षेत्रासाठी स्‍पर्धेचे वर्ग उघडून गुणवंत विद्यार्थी निर्माण करावे असे आवाहन केले.
यावेळी व्‍यासपिठावरुन अनेक मान्‍यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उल्‍लेखनिय व वैशिष्‍ठयपूर्ण काम करणा-या व्‍यक्‍तींचा मान्‍यवरांचे हस्‍ते समाजभूषण पुरस्‍कार देवून  गौरविण्‍यात आले.तसेच 37 जेष्‍ठ नागरीक व 75 प्रतिशनाच्‍या वर 10 वी मध्‍ये गुण प्राप्‍त करणारे 30 विद्यार्थी तसेच 12 वी मध्‍ये गुण प्रापत करणारे 12 विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार व गुणगौरव करण्‍यात आला.
            या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक वसंत पाल यांनी केले तर संचालन प्रा. उमेश बोबडे व आभार गजानन नांदूरकर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी मोठया संखेने हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यातील नागरीक व ग्रामस्‍थ उपस्थित होते.
                                                       00000

No comments:

Post a Comment