महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि. 5 ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.5- जिल्ह्याच्या ठिकाणी शेतक-यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याकरीता व त्यावर उपाययोजना करण्याकरीता शासनाने किसान टोल फ्री सेवा दुरध्वनीवर शेतकरी बांधवांना निर्माण झालेल्या पिकासंबधी तसेच खतासंबधी अडीअडचणी, किडीचा प्रार्दुभावाबाबत माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी किसान टोल फ्री सेवा दुरध्वनी क्रमांक 07152-250099 असा असून या क्रमांकावर तक्रार दिल्यास त्यावर शेतकरी बांधवाना ताबडतोब आपल्या शंका, अडीअडचणीबाबत मोफत सल्ला तंत्र सल्लागारा मार्फत देण्यात येईल.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, किसान टोल फ्री दुरध्वनी क्रमांक 07152-250099 या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा़, असे जिल्हा कृषी अधिक्षक,कृषी अधिकारी, वर्धा कळवितात.
00000
No comments:
Post a Comment