Sunday 2 October 2011

सामाजिक बांधिलकीचे उपक्रम यशस्वी करा - राजेंद्र मुळक


                  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.२ ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------ 
वर्धा, दि. 2 - सामाजिक बांधिलकी असणा-या तीन महत्वपूर्ण योजनांची गांधी जयंती दिनी होत आहे. यामध्ये वर्धा जिल्हा अग्रेसर राहील या दृष्टीने अधिका-यांनी काम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. राजेंद्र मुळक यांनी आज येथे केले.

     गांधी जयंतीचे औचित्य साधून आज जिल्हाभरात स्वच्छता उत्सव तसेच सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण मोहिम आणि व्यसनमुक्ती व अंमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. राजेंद्र मुळक यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
     या कार्यक्रमास विदर्भ पाटबंधारे विकास महामंडहाचे उपाध्यक्ष आमदार सुरेश देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच  जिल्हा परिषद अध्यक्ष विजय जयस्वाल, उपाध्यक्ष सुनील राऊत, सभापती (अर्थ) महानामा रामटेके, सभापती (महिला व बालकल्याण) रजनी देशमुख, सभापती (समाज कल्याण) महानंदा कंगाले, जिल्हाधिकारी जयश्री भोज तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
     या प्रसंगी स्वच्छता उत्सवादरम्यान विविध स्तरावर आयोजित करण्यात कार्यक्रमांची माहिती शेखर चन्ने यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये दिली.
सामाजिक, आर्थिक व जातसर्वेक्षण मोहिमे दरम्यान येणारी कार्यवाही तसेच वर्धा जिल्ह्यात होणार असलेल्या शालेय पटपडताळणीच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारी संगणीकृत सादरीकरण जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी यावेळी केले.
     पालकमंत्री मुळक यांच्या हस्ते याप्रसंगी व्यसनमुकती व स्वच्छता सप्ताहानिमित्त खास मशाल प्रज्वलीत करण्यात आली.
     कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. मोहन यांनी केले.
                     00000


No comments:

Post a Comment