Friday 14 October 2011

हात धुवा हात... !


विशेष लेख क्र.               जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा 
दि.15 ऑक्टोंबर 2011                                                

     
वैयक्तिक स्वच्छतेत हातांची स्वच्छता राखण्याचे महत्व खूप आहे. याची जाणीव सर्वांना व्हावी यासाठी जागतिक स्तरावर हात धुण्याचा दिवस साजरा केला जातो या संदर्भात हा खास लेख

     आपला हात आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वाचा अवयव आहे. आपण अन्न सेवन आपल्या हातांनी करीत असतो म्हणूनच या हातांची स्वच्छता ही महत्वाची ठरत असते आपल्या हातांच्या स्वच्छतेवर आपल्या पोटाचे आरोग्य अवलंबून आहे. नियमितपणे हात स्वच्छ ठेवणे यासाठीच आवश्यक आहे.
     पूर्वीच्या काळी बाहेरुन आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुण्याची प्रथा होती. त्यासाठी अंगणात कायम पाण्याची एक बादली भरुन ठेवलेली असायची आता काळाच्या ओघात ही परंपरा मागे पडली आहे. शास्त्रोक्त पध्दतीने विचार केल्यास ती पध्दत योग्यच होती हे आपणास सांगता येईल
     आपण विविध ठिकाणी वेगवेगळया वस्तूंना कामानिमित्य स्पर्श करीत असतो. त्या पदार्थावर वातावरणातील धुळीसोबत जीव-जंतूंचा संसर्ग झालेला असतो त्यामुळे कुठेही आणि कधीही  अन्नसेवन करण्यापूर्वी हात स्वच्छ धूवून घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास ते जीव जंतू हातांच्या माध्यमातून पोटात जातात. यातून अगदी विषबाधेपर्यंत धोका असतो.                      
शौचाला जाऊन आल्यानंतर तसेच लघवीहून आल्यानंतर हात धुणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलांना आपण याची जाणीव करुन द्यायला हवी लहान मुले ब-याचदा मातीत खेळतात ही माती अनेक जीवजंतूचा साठा असू शकते त्यामुळे त्यांना वेळोवेळी नखे कापण्याची सवय आपण लावायला हवी या नखातील माती हात धुतल्याने निघत नाही मात्र जेवताना त्योचअंश पोटात जात असतात त्यातून आरोग्य हमखासपणे बिघडते म्हणूनच पालकांनी याबाबत जागरुक राहण्याची आवश्यकता आहे.
     नखे वाढविण्याची सवय मोठया व्यक्तींनाही असते. पाश्चात्य पध्दतीने अनुकरण करताना आपण असे करतो मात्र पाश्चात्य संस्कृतीत जेवण हे काटया-चमच्याने केले जाते हातांचा स्पर्शदेखील अन्नाला होत नाही हे आपण लक्षात ठेवायला हवे.
     आपल्या हातांची स्वच्छता राखणे म्हणजे आरोग्य संपन्न होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकणे होय त्यासाठी आता निर्धार करा आणि आरोग्य संपन्न व्हा.
                               प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment