महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.13 ऑक्टोंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
वर्धा, दि.13- शेतीत काम करणा-या मजुरांची संख्या कमी होत असल्यामुळे शेतीची कामे वेळेवर होत नाहीत व त्यामुळे पिकाच्या उत्पन्नावर विपरीत परीणाम होत आहे. याकरीता शासनाचा भर शेतीचे यांत्रिकीकरणावर आहे. त्याकरीता शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, गळीतधान्य उत्पादन कार्यक्रम अंतर्गत 50 टक्के अनुदानावर विविध अवजारांचा पुरवठा करण्याच्या योजना राबविण्यात येत आहेत.
सन 2011-12 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात 50 टक्के अनुदानावर इलेक्ट्रीक मोटारपंप संच, पेट्रोकेरोसीन पंपसंच, नॅपसॅक स्प्रेपंप, ट्रॅक्टर चीत पेरणी यंत्र बैलचचीत दोनचाडी तिफन, रोटरी टिलर, रोटोव्हेटर, एच.डी.पी.ई. पाईप पुरविण्याची तसेच गळीत धान्य कार्यक्रम ब्रश कटर व बहुपीकमळणीयंत्र पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे.
या अवजारांचा पुरवठा सन 2011-12 मध्ये प्रकल्पा अंतर्गत निवड झालेल्या गावातील लाभार्थींना वैयक्तीक व गट मार्फत करण्यात येईल. वैयक्तीक लाभात नॅपसॅक स्प्रेपंप, HDPE पाईप, पेट्रोकेरोसीन पंपसंच व इलेक्ट्रीक मोटारपंप, दोनचाडी तिफन तर शेतकरी गटाला ब्रशकटर, रोटरी टिलर, रोटाव्हेटर व बहुपीक मळणी यंत्राचा लाभ घेता येईल. सदर योजनेत अवजारांवर 50 टक्के किंवा जास्तीत जास्त नॅपसॅक स्प्रेपंप रुपये 633, ईमोपंपसंच रुपये 7160, पेट्रोकेरोसीन 8426, दोनचाडी तिफन रुपये 1374, ब्रशकटर रु.12500, रोटरी टिलर 28000, रोटाव्हेटर रुपये 30000 व बहू पीक मळणी रुपये 24000 अनुदानावर उपलब्ध आहेत.
शेतकरी व शेतकरी गटांनी शेती अवजारांची माहिती व लाभा करीता नजिकच्या तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment