Friday 14 October 2011

कृषि यांत्रिकीकरणावर प्रात्यक्षिक व मिडो ऑर्चड पेरु क्षेत्रीय भेट


     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.14 ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------   
         
     वर्धा, दि.14- कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना अंतर्गत नुकतेच कुटकी ता.जि.वर्धा येथील प्रमोद पाटील यांचे शेतावर कृषि यांत्रिकीकरणावर प्रात्यक्षिक व पेरु पिकाची लागवड (मिडो ऑर्चड) क्षेत्रीय भेट या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला.
     कार्यक्रमाचे उदघाटक आदर्श गांव समिती महाराष्ट्र राज्याचे   अध्यक्ष पोपटराव पवार उपस्थित  होते.
     यावेळी पोपटराव पवार यांनी गाव हे कसे असावयास पाहिजे व गावाचा विकास कसा करावयाचा, हिवरे बाजार गावातील    शेतक-यांचे उत्पन्न कशा प्रकारे वाढले, गावातील शेतक-यांची प्रगती कशी होत गेली.
 मृद संधारण व जलसंधारण इत्यादी बाबीचे महत्व विषद केले. शेतक-यांच्या  प्रगतीसाठी पाण्याचे नियोजन करणे, फलोत्पादन, भाजीपाला, कुक्कुटपालन, पशुधन इत्यादी जोडधंदा शेती बरोबर करणे आवश्यक असल्याचे सांगितले.विदर्भामध्ये सरासरी 1200 मि.मी. पाऊस पडतो. सुपीक जमीनीचा नियोजनबध्द उपयोग करणे, गट शेतीवदारे शेतीच्या समसया सोडविणे आवश्यक आहे. शेत मालावर प्राथमिक प्रक्रिया करणे. महिला बचत गट निर्मीती करुन महिला सखमीकरण करणे आवश्यक असल्याचे तसेच शेती मधील मजुर समस्यावर कृषि यांत्रिकीकरण हा एकमेव पर्याय असुन गट पध्दतीने शेती करण्यावर कृषि विभागाचा वेळोवेळी सल्ला घेऊन शास्त्रीय पध्दतीने शेती करण्याचे आवाहन केले.            
मार्गदर्शन करताना पोपटराव पवार
प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ब-हाटे यांनी कृषि योजनेमध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना अंतर्गत जिल्ह्यासाठी 37 शेडनेट हाऊसचे 17 पॅकहाऊसचे तसेच रोजगार हमी योजने अंतर्गत फळझाड लागवडीचे 795 हेक्टर लक्षांक असल्याचे सांगितले. कडधान्य व गळीतधान्य यांचे उत्पादन व उत्पादकता वाढविणेसाठी कृषि यांत्रिकीकरणाची विशेष मोहीम सन 2010-11 अंतर्गत 37 गट , संस्थाचे लक्षांक असून ते पूर्ण झालेले आहे.
 गळीतधान्य कार्यक्रमा अंतर्गत 71 प्रकल्पाचे सधन कापूस योजने अंतर्गत 18 प्रकल्पाचे व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान मध्ये 23 प्रकल्पाचे व तृणधान्य कार्यक्रमामध्ये 22 प्रकल्पाचे लक्षांक असल्याचे सांगितले. तसेच कृषि विभागा अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती दिली.
     प्रमोद पाटील यांनी आपल्या कृषि यांत्रिकीकरणामध्ये त्यांच्या शेतीमधील मजुरीवरील खर्च कमी कशा प्रकारे झाला. तसेच कृषि अवजाराचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. नंतर पेरु पिकाची लागवड मिडो ऑर्चड याबाबत माहिती दिली.
     या कार्यक्रमास शेतकरी, गट प्रमुख उपस्थित होते.
                        000000

No comments:

Post a Comment