महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.6 सप्टेंबर 2011
------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.6-वर्धा जिल्ह्यातील मुख्यालयी व सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालये तसेच धर्मदाय आयुक्त व इतर न्यायालये व न्यायाधिकरणे यांच्याकडील प्रलंबीत प्रकरणामुळे दुरावलेले संबंध सामंजस्याने सोडविण्याकरीता सुवर्ण संधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
याबाबत दि. 18 सप्टेंबर रोजी 2011 रोजी `महा लोक अदालत ` भरविण्यात येणार आहे.
प्रकरणे सामंजस्याने सोडविण्याकरीता न्यायाधीश, तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ (पॅनल) मदत करणार आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा तर्फे आवाहन करण्यात येते की, न्यायालयात दाखल असलेली प्रकरणे महा-लोक-अदालतीमध्ये ठेवण्याकरीता संबंधितांनी आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबीत असतील त्या न्यायालयात अर्ज करावा, तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,वर्धा किंवा तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज करावा व दिनांक 18 सप्टेंबर 2011 रोजी आयोजित करण्यात येणा-या महालोक अदालतीमध्ये आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने सोडवावीत.
तसेच भारतीय दुरसंचार विभाग,वर्धा ह्यांचेतर्फे सुमारे 1000 दाखलपुर्व प्रकरणे महालोक अदालतमध्ये ठेवलेली आहेत. याची सर्व भारतीय दुरसंचार ग्राहकाने लाभ घ्यावा.असे एस.एम.यल्लट्टी, सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment