वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवी
सुरक्षित
Ø
ठेवी परतीचे आवश्यक धोरण
वर्धा, दि.7- वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर रिर्जव
बँकेनी लावलेले निर्बंध मागे घेऊन 2 मे
रोजी बॅकींग परवाना परत केल्यामुळे बँक
पुढील व्यवसाय सुरु करण्यास पात्र झालेली आहे.
बँकेच्या प्राधिकृत समिती सभेने
बँकेच्या आर्थिक स्थितीचा 1 जुन रोजी आढावा घेऊन बॅकींग व्यवहार सुरु करण्यासाठी
धोरण ठरविण्यात आले आहे.
वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवीदाराच्या ठेवी
सुरक्षित असून ठेवी परत करण्यासंदर्भात आवश्यक धोरण ठरविण्यात आले आहे. सर्व ठेविदारांना
त्यांच्या ठेवीवर व्याज आकारणी करण्यात येत आहे.
बँकेचे व्यवहार मागील 2 वर्षापासून पूर्ण बंद असल्यामुळे
ज्या बहुतांश मुदती ठेवीची डयू डेट संपलेली आहे तसेच त्यांचे नुतणीकरण करता आले
नाही. अशा ठेवीचे डयू डेटच्या तारखेपासुन आज पर्यतचे कालावधीकरिता निर्धारित व्याजदराने किंवा
ठेवीचे डयू डेट झाल्यापासुन जो कालावधी झाला असेल त्या कालावधीसाठी असलेला मुदती
ठेवीचा व्याजदर यात जो कमी असेल त्या व्याजदराने नुतणीकरण करण्यात येणार आहे व
यापुढे सुधारीत व्याजदराने त्याचे नुतणीकरण करण्यात येईल. त्यामुळे ठेवीदाराचे
हित सुरक्षित राहिल व त्यांचे ठेवीवरील व्याजाचे नुकसान होणार नाही.
ठेवीदारांकडे कोणत्याही प्रकारचे तसेच विविध
कार्यकारी सहकारी संस्थेचे थकीत कर्ज असल्यास ठेवीची रक्कम त्याचे कर्जात वळती
करण्यात येईल. किंवा त्यांच्या कुंटूबांतील व्यक्ती यांचे कडे असलेल्या बँक
कर्जाचे वसुलीपोटी ठेवीदारांचे संमतीने बॅकेत असलेल्या ठेवीची रक्कम वळती करुन
नोडयू प्रमाणपत्र प्राप्त करुन घेता येइल. इतरांच्या कर्ज खात्यावर ठेवीची रक्कम
वळविता येणार नाही.
मुदती ठेवी, चालू खाते व बचत खात्याबाबत कोणत्याही
ठेवीदाराला त्यांच्या मुदती ठेवीची रक्कम मुदतपुर्व , मुदतीनंतर सद्यस्थितीत किमान
एक वर्ष परत करता येणार नाही. फक्त वैयक्तिक खातेदारांना बचत ठेवीवर मिळणा-या व्याजाची
उचल 50 टक्के प्रमाणे तिमाही अदा करण्यात येईल. चालू खात्यावर तथा बचत खात्यावर
जून्या बाकीतून रक्कम काढता येणार नाही. ही कारवाई 1 जुलै पासुन सुरु करण्यात
येणार आहे. नागरी बँक व सोसायटीचे मुदती ठेवीचे डयू डेटपर्यंतचे व्याजाची रक्कम
त्याचे बचत ठेव, चालू ठेव खात्यात जम करण्यात येईल. परंतु व्याजाची रक्कम उचल
करता येणार नसल्याचे धोरण ठरविण्यात आले आहे.
बँकेचे व्यवहार बंद असल्यामुळे मंजुर कर्ज मर्यादेवर
व्यवहार होऊ न शकल्याने कर्ज थकित झालेले आहे. अशा कर्जदारांकडून घेणे असलेल्या
रक्कमेसह डयू झालेल्या व्याजाचा भरणा करुन त्यांचे कर्ज खाते नुतनीकरण करण्यात
येणार असल्याचे व्यवस्थापक , वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक मर्या. वर्धा
यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment