Thursday 5 May 2016

                  खरीप हंगामात शेतक-यांना खते, बियाने व
                         पिक कर्ज सहजपणे उपलब्‍ध करुन देणार
                                                सुधीर मुनगंटीवार
Ø  शेतकरी स्‍वाभीमानी वर्ष म्‍हणून साजरे करणार
Ø
Ø  4 लाख 14 हजार 550 हेक्‍टरवर खरीपाचे नियोजन
Øमागेल त्‍याला शेततळे कार्यक्रम प्रभावीपणे राबविणार
Ø  700 कोटीचे खरीप पिक कर्ज नियोजन
Ø7 हजार 625 क्विंटल बियाण्‍यांची उपलब्‍धता
Ø  सोयाबीन ऐवजी तूर,ज्‍वारी मुग पिकांना नियोजनात प्राधान्‍य 
वर्धा, दि.23-खरीप हंगामासाठी शेतक-यांना बियाने व खतांची कुठल्‍याही प्रकारे अडचण जाणार नाही त्‍यांना सहजपणे बियाण्‍याची उपलब्‍धता होईल या दृष्टीने नियोजन करतांनाच पिक कर्जासाठी सातशे कोटी रुपयाचे नियोजन करण्‍यात आले असून शेतक-यांना त्‍यांच्‍या मागणीनुसार 15 मे पर्यंत सहज व सुलभपणे पत पुरवठा करण्‍याच्‍या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्‍या.
          विकास भवन येथे जिल्‍हयाच्‍या खरीप हंगाम आढावा बैठक राज्‍याचे वित्‍त व नियोजन मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आले  त्‍यावेळी ते मार्गदर्शन करतांना ते  बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस , आमदार सर्वररणजित कांबळे, समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, जिल्‍हा परिषेदेच उपाध्‍यक्ष विलास कांबळे, सभापती श्रीमती श्‍यामला अग्रवाल, श्रीमती चेतनाताई मानमोडे, वंसतराव आंबटकर, प्रभारी जिल्‍हाधिकारी दिपक नलावडे ,मुख्‍यकार्यपालन अधिकारी संजय मीना, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती, कृषी उपसंचालक, श्री. राऊत आदी उपस्थित होते.
खरीप हंगामासाठी 4 लाख 14 हजार 550 हेक्‍टर पिक पेरणीचे नियोजन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये 2 लाख 27 हजार हेक्‍टर कापूस 1 लाख हजार हेक्‍टर सोयाबिन 70 हजार हेक्‍टर तूर 4 हजार 500 हेक्‍टर ज्‍वारी , भूईमुग , उडीद व तीळ आदीचा समावेश आहे. कापूस व तूर या बियान्‍यांमध्‍ये वाढ अपेक्षित असल्‍याने 67 हजार 825 क्विटंल बियाण्‍याची मागणी करण्‍यात आली असून यामध्‍ये 27 हजार 377 क्विंटल बियाने महाबिज तर्फे तर 40 हजार 448 क्विंटल बियाणे खासगी क्षेत्रातून उपलब्‍ध होणार खताच्‍या मागणीनुसार 1 लाख 24 हजार 400 मे.टनाचे आवंटन मंजुर झाले आहे.
जिल्‍हयात मागील वर्षी सरासरी पाऊस पडला असला तरी शेतक-यांना उत्‍पादन कमी झाले आहे. पीकाची उत्‍पादकता वाढण्‍याच्‍या काळामध्‍येच पावसाने दडी मारल्‍यामुळे मोठया प्रमाणात शेतकरी विवंचणेत सापडला आहे. यावर्षी चांगल्‍या पावसाचे संकेत असल्‍यामुळे खरीप हंगामात शेतक-यांना कुठल्‍याही प्रकारे बियाणे व खताची कमतरता पडणार नाही असे नियोजन करण्‍यात आले असल्‍याचे पालकमंत्री सूधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
हे वर्ष शेतकरी स्‍वाभीमानी वर्ष म्‍हणुन साजरे करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असल्‍याचे सांगताना पालकमंत्री पुढे म्‍हणाले की, शेतकरी अस्‍मानी संकटाचा सामना करत असतांना शासन खंबीरपणे शेतक-यांच्‍या पाठीशी उभे असल्‍याचे सांगतांना  पंतप्रधान कृषी पिक विमा योजना सर्वच पिकांना विम्‍याचे संरक्षण देणार आहे. पावसाचा खंड पडल्‍यामुळे नुकसान झाले असल्‍यास त्‍याचाही लाभ्‍ या योजनेतून मिळणार आहे.
शेतक-यांना विजेचे कनेक्‍शन देतांना कालबध्‍द कार्यक्रम तयार करा तसेच पावसाळयात देखभाल दुरुस्‍तीच्‍या दृष्‍टीने तालुका व झोन निहाय कृती आराखडा तयार करुन त्‍याचे नियोजन करण्‍याच्‍या सुचना देतांना वर्धा जिल्‍हा शेतकरी आत्‍महत्या ग्रस्‍त जिल्‍हा असल्‍यामुळे मागेल त्‍याला शेततळे या कार्यक्रमामध्‍ये आवश्‍यक शेततळे निर्माण करण्‍यात येतील यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. जिल्‍हयातील शेतकरी खासगी सावकारांकडे जाणार नाही यासाठी बॅकांनी सहज व सुलभ्‍पणे कर्ज पुरवठा करावा. सिंचनासाठी पाणी उपलब्‍ध करुन देण्‍यासंदर्भात तात्‍काळ नियोजन करावे अशा सुचनाही बैठकीत त्‍यांनी दिल्‍या.
शेतकयांना बियाण्‍यांचा पुरवठा करतांना चागल्‍या प्रतीचे व उगवण होणारे बियाणे उपलब्‍ध करुन दया जर खराब बियाणे दिल्‍यास संबंधिविरुध कडक करवाई करा अशी सुचना आमदार समिर कुणारवार यांनी केली. सिंचनासाठी उपलब्‍ध निधी खर्च होत नसल्‍याबाबत तात्‍काळ कारवाई करण्‍याच्‍या सुचना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी करताच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्‍याचे निर्देश पालकमंत्रयानी बैठकीत दिले. सोयाबिनचे उत्‍पादन कमी झाल्‍यामुळे यावर्षी पर्यायी पीक म्हुणुन तूर इतर पिकासंर्दभात शेतक-यांना मार्गदर्शन करण्‍याच्‍या सुचना आमदार रणजित कांबळे यांनी केले.
प्रांरभी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती यांनी स्‍वागत करुन प्रास्‍ताविका खरीप हंगामात पिकांचे नियोजनाची माहिती दिली.  कृषी विभागातर्फे तयार करण्‍यात आलेल्‍या घडी पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्‍ते झाले.
रण्‍याच्‍या भ् सहज व सुलभ्‍पणे                 सन 2016-17 मधील अभियान
       राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियान, राष्‍ट्रीय गळीत धान्‍य तेलताड व वृक्ष आधारित तेलबिया अभियान, जमीन आरोग्यपत्रिका वितरण अभियानातंर्गत 31 हजार आरोग्‍य पत्रिकेचे लक्ष्‍य, राष्‍ट्रीय शाश्‍वत  शेती अभियान, कृषी यांत्रिकिकरण उप‍अभियान, सोयाबीन बियानाचे घरगुती वापराबाबत गावनिहाय प्रशिक्षण व प्रसिध्‍दी, बियाणे खते व किटकनाशके यांचे गुणवत्‍ता नियंत्रणाबाबत तालुका व जिल्‍हास्‍तरावर भरारी पथकाची निर्मिती, मनरेगा अंतर्गत वैयक्तिक शेतकरी लाभार्थीकरिता फळबाग योजना, ईस्‍त्राईल पध्‍दतीने संत्रा लागवड, शेतकरी गटामार्फत सोयाबीन बिजोत्‍पादन कार्यक्रम राबविणे.

                                         0000

No comments:

Post a Comment