समन्वयातूनच जिल्ह्याचा
सर्वांगीण विकास
-
आशुतोष सलील
Ø सीईओ संजय मीना यांना प्रशासनातर्फे भावपूर्ण निरोप
वर्धा, दि. 3 : शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत
जिल्हा परिषद तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यामध्ये समन्वय असल्यास जिल्ह्याचा
सर्वांगीण विकास सहजपणे होऊ शकतो. मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना यांनी
ग्रामीण विकासात विविध योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे राज्यस्तरावर जिल्ह्याचा
गौरव झाला असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुख्य कार्यपालन
अधिकारी संजय मीना यांची अकोला येथील महाबीज येथे बदली झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण
निरोप देण्यात आला. त्याप्रसंगी श्री.
सलील बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, प्रभारी मुख्य कार्यपालन
अधिकारी प्रमोद पवार, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उप मुख्य कार्यपालन
अधिकारी श्री. इलमे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती तसेच जिल्हा
माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, उप वनसंरक्षक
श्री. पगार आदी उपस्थित होते.
संजय मीना यांनी वर्धा येथे यशवंत समृद्ध ग्राम योजना तसेच
निर्मल ग्राम योजना उत्कृष्ट काम केल्याने जिल्ह्याचा राज्यस्तरावर गौरव झाला आहे.
जलयुक्त शिवार अभियानातही केलेल्या कामामुळे वर्धा जिल्ह्याचे राज्यात उत्कृष्ट
योगदान राहिले आहे. संजय मीना यांनी जिल्हा प्रशासनासोबत सातत्याने समन्वय साधून केलेल्या
कामाबद्दल जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी गौरोवद् गार काढून नवीन पदावरील कार्यकाळाशी यशस्वी राहण्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
संजय मीना यांना जिल्हा प्रशासनातर्फे शाल, श्रीफळ व भेट
वस्तू देऊन जिल्हाधिकारी आशुतोष सलील व जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी
सत्कार केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी प्रशासनासोबत कायम समन्वय ठेवून येणाऱ्या अडचणी
सोडविण्यासाठी सातत्याने सहकार्य केले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे
योगदान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती,
जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, निवासी उप
जिल्हाधिकारी वैभव नवाडकर उप वनसंरक्षक श्री. पगार यांनी संजय मीना यांच्या कार्याचा गौरव करुन शुभेच्छा
दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन उप मुख्य कार्यपालन अधिकारी श्री. इलमे यांनी तर आभार प्रदर्शन महिला व बाल
कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यपालन अधिकारी श्री. मेसरे यांनी मानले. यावेळी
विविध विभागांचे विभाग प्रमुख, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment