Thursday 27 September 2012

जमिनीचे भोगवाटपदार परावर्तीत करण्‍यासाठी विशेष मोहीम - जयश्री भोज


 जिल्‍ह्यात 1 लक्ष 56 हजार 150 भोगवाटपदार
वर्धा, दिनांक 27- जिल्‍ह्यातील भोगवाटपदार वर्ग दोन मध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या जमिनीचे विक्री हस्‍तांतरण करतेवेळी   शेतक-यांना  मानसिक त्रास किंवा अडचण निर्माण होऊ नये म्‍हणून  भोगवाटपदार वर्ग दोन मधून एक मध्‍ये  परावर्तीत करण्‍यासाठी  विशेष मोहीम राबविण्‍यात येत असल्‍याची  माहिती जिल्‍हाधिकारी  जयश्री  भोज यांनी दिली.
शेतक-यांना  भुस्‍वामी भोगवाटपदार वर्ग एक मध्‍ये  परावर्तीत करण्‍यासाठी जिल्‍ह्यात विशेष मोहीम राबविण्‍यात येत असून, 1 लक्ष  56 हजार 150 भोगवाटपदार वर्ग दोन च्‍या शेतकरी खातेदारांपैकी  53 हजार 742  खातेदारांनीच विशेष मोहीमे अंतर्गत अर्ज  सादर केले आहेत. भूस्‍वामी  शेतक-यांनी या विशेष मोहीमेत सहभागी होवून, संबंधीत   उपविभागीय अधिकारी  यांचेकडे  भोगवाटपदार परावर्तीत करण्‍यासाठी अर्ज करावे, असे आवाहनही  जिल्‍हाधिकारी  श्रीमती  जयश्री भोज यांनी केले आहे.
          जिल्‍ह्यातील भोगवाटपदार वर्ग दोन मध्‍ये समाविष्‍ट  असलेल्‍या जमिनींची विक्री, हस्‍तांतरण , दस्‍तनोंदणी  करण्‍यापूर्वी  जमिनी  शासकीय वाटपातील आहे किंवा कसे याबाबत तपासणी होणे आवश्‍यक आहे. भोगवाटपदार वर्ग दोन मध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या जमिनीची विक्री, हस्‍तांतरण करतेवेळेस उपविभागीय महसूल अधिकारी हे सक्षम अधिकारी असल्‍याने त्‍यांचे ना हरकत प्रमाणपत्र, परवानगी असल्‍याशिवाय  दुय्यम  निबंधक यांचेकडे दसताऐवजाची नोंद होणार नसल्‍याने जिल्‍ह्यातील  खातेदार शेतक-यांना मानसीक त्रास किंवा अडचण निर्माण होऊ नये म्‍हणून   जिल्‍ह्यात विशेष मोहीम राबविण्‍यात येत आहे.  या मोहीमेचा लाभ  सर्व शेतकरी खातेदारांनी घ्‍यावा, असे आवाहनही  जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.
                                                00000000

1 comment:

  1. kul kayadyamule sarvasamanya sheti malakanchi fasawanuk hoet aahe.

    ReplyDelete