आचारसंहिता लागू
वर्धा, दि. 26- सेलू तालुक्यातील
आलगाव व कारंजा तालुक्यातील
बोरगाव (गोंडी), सुसुंद, चोपन , बेलगाव व
धर्ती या सहा ग्रामपंचायतीच्या निवउणूका जाहीर
झाल्या असून, निवडणूका 21 ऑक्टोंबर रोजी असल्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रात आचार संहिता लागू असल्याचे
माहिती जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने वर्धा जिल्ह्यात नोव्हेंबर 2012 या
कालावधीत मुदतीत संपणा-या ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर केल्या असून, सेलू तालुक्यातील आलगाव व कारंजा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे संबधीत
ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक कार्यक्रम झाल्या पासून निवडणूक प्रक्रिया
पूर्ण होईपर्यंत आचार संहिता लागू राहणार आहे. आदर्श आचार संहितेचा भंग होणार
नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी , असे
आवाहनही जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment