वर्धा, दि. 23 – केंद्रीय ग्राम विकास मंत्री जयराम रमेश यांनी सेवाग्राम येथील बापू कुटीस भेट देवून
संपूर्ण आश्रम परिसराची पहाणी केली. तसेच सेवाग्राम परिसरात सुरु असलेल्या विविध
उपक्रमाची माहिती घेतली.
सेवाग्राम येथील बापू कुटीच्या परिसरात नक्षलवादी हिंसा
थांबविण्यासाठी गांधीजींचा विचार याविषयावर आयोजित विचार मंथन बैठकीतही जयराम
रमेश सहभागी झाले होते. या विचार मंथन बैठकीचे आयोजन गांधीवादी विचारवंत डॉ. सुगंध
बरठ यांनी केले होते.
सर्वसेवा संघाच्या अध्यक्ष श्रीमती राधाबेन भट यांच्या अध्यक्षतेखाली
नक्षलवादसे बढती हिंसा और गांधीजनकी भुमिका या विषयावर या बैठकीत जेष्ठ गांधीवादी विचारवंत यांनी आपली भूमिका मांडली.
दंडकारन्यांमध्ये शांतीचे कार्य पुढे सुरु ठेवण्यासाठी गांधी विचारांची बैठक
तसेच या भागातील विकासाची दिशा ठरवून ती कशी पुढे सुरु ठेवता येईल या विषयावर
प्रामुख्याने यावेळी चर्चा करण्यात आली.
नक्षलग्रस्त भागांचा विकास साधतांनाच संवेदन सुरक्षेच्या
दृष्टीने पावले टाकणे , राजकीय प्रक्रियेतून स्थानिक नेतृत्व विकसित व्हावे तसेच
विकासासंदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण करावी
आणि गांधीजींच्या विचारांनी अहिंसक, मानविय व विकासात्मक दृष्टीकोण
ठेवून ग्रामीण भागांचा विकास आदि विषयावर यावेळी विचार मंथन करण्यात आले.
यावेळी डॉ. सुमंत बरठ यांच्यासह नारायणदास, शशिभाई, राधाबेन
भट, डी.के.मनिष,आदित्य पटनायक, एम. तेजस्वानी, आशिशकुमार, के.एस.गोपाल, श्रीकांत
बाराहाते, अविनाश काकडे, मोहन हिराभाई हिरालाल, शंकर दत्त, देवाजी तोफा, डॉ.सुरेश
साहू, रजत अवसत, तेजस्ती, तसेच जेष्ट गांधीवादी विचारवंत यावेळी उपस्थित होते.
सेवाग्राम आश्रमाला भेट
केंद्रीय
ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी आज सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. त्यावेळी
सेवाग्राम आश्रम पतिष्टानचे अध्यक्ष मा.म. गडकरी, जिल्हाधिकारी जयश्री भोज,
मुख्य कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प
संचालक बी.एस.मोहन, उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, तहसीलदार सुशांत बनसोड आदि अधिकारी व
पदाधिका-यांनी स्वागत केले.
0000
No comments:
Post a Comment