134 कलम लागू
वर्धा, दि. 27 – जिल्ह्यात शांतता व सुव्यवसथा
कायम राखण्यासाठी सर्व जनतेनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस
अधिक्षक अविनाश कुमार यांनी केले आहे.
घरघुती तसेच सार्वजनिक गणतीचे विर्सजन, त्यानंतर शहरी व
ग्रामीण भागात 3 ऑक्टोंबर पासून हडपक्या
गणपतीचा उत्सव व माध्यमिक शालांत परीक्षेच्या काळात कायदा व सुव्यवस्था
कायम राहावी म्हणून दिनांक 29 सप्टेंबर
ते 13 ऑक्टोंबर पर्यंतच्या कालावधीत मुबई पोलीस अधिनियम 1951 चे 36 अन्वये अ आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशाचा भंग करणा-या व्यक्ती
विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 134 अन्वये कार्यवाहीस पात्र राहतील.जिल्ह्यात
या कालावधीत जाहीर सभा, निदर्शने, मोर्चे, शोभायात्रा आदिंसाठी पोलीस स्टेशन
अधिकारी यांचेकडून परवानगी घेतलयाशिवाय
आयोजन करण्यात येवू नये तसेच शांततेला व सुव्यवस्थेला बाधा आणणा-या
घोषणा देऊ नये असेही जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांनी जाहीर केलेल्या आदेशात म्हटले आहे.
0000
No comments:
Post a Comment