Saturday 29 September 2012

जिल्‍ह्यात 37 कलम लागू


वर्धा, दि. 29 – शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍ह्यात दि. 13 ऑक्‍टोंबर पर्यंत मुंबई  पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 3 लागू  करण्‍यात आली असल्‍याची माहिती  जिल्‍हादंडाधिकारी  तथा जिल्‍हाधिकारी  जयश्री भोज यांनी  आज दिली.
         जिल्‍ह्यात कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित रहावी,   यासाठी  आजपासून ते दिनांक  13  ऑक्‍टोंबरच्‍या मध्‍यरात्री पर्यंत  संपूर्ण जिल्‍ह्यात कलम 37  लागू राहणार असून, या कायद्याचा   भंग करणा-या व्‍यक्‍ती  विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल. असेही आज जारी केलेल्‍या  आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.
                                              0000 

No comments:

Post a Comment