वर्धा,
दि. 29 – शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यात दि. 13 ऑक्टोंबर
पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम
37 (1) व 3 लागू करण्यात आली असल्याची
माहिती जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी आज दिली.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित
रहावी, यासाठी आजपासून ते दिनांक 13 ऑक्टोंबरच्या
मध्यरात्री पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात
कलम 37 लागू राहणार असून, या कायद्याचा भंग करणा-या व्यक्ती विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल. असेही
आज जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात
आले आहे.
0000
No comments:
Post a Comment