वर्धा,दि.24- सोयाबीन, कापूस तसेच तुरीच्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे शेतक-यांनी पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी विभागातर्फे गळीत धान्य विकास कार्यक्रमाअंतर्गत जैवीक व रासायनीक औषधांचा पुरवठा तालुका स्तरावर उपलब्ध करुन दिला असून, शेतक-यांना आवश्यकतेनुसार 50 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात केन्द्र पुरस्कृत गळीत धान्य विकास कार्यक्रमा अंतर्गत सोयाबीन पिकांची 56 प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पा अंतर्गत सोयाबीनवर येणा-या किड रोगाच्या नियंत्रणासाठी रासायनीक व जैविक औषधे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यामध्ये अॅझाडीरेक्टीन 1500 पीपीएम चा 1 हजार 120 लिटरचा पुरवठा, बिव्हेरीया बॅसियाना चा 4 हजार 480 किलोचा पुरवठा, सुडोमोनास 2 हजार 240 किलो व वहर्टीसिलीयम 4 हजार 480 किलोचा पुरवठा करण्यात आला आहे.
सोयाबीन या पिकासाठी जैविक किड नियंत्रणा अंतर्गत बिव्हेरीया 2 हजार 464 किलो व व्हर्टीसिलीयमचा 1 हजार 232 किेलोचा पुरवठा ही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शेतक-यांच्या मागणीनुसार पीक संरक्षण औषधी चा पुरवठा सुध्दा उपलब्ध झाला आहे. केन्द्र पुरस्कृत गळित धान्य विकास कार्यक्रमा अंतर्गत बिव्होरीया बासीयानाचाही पुरवठा करण्यात येत आहे.
पिकावरील किड रोग संरक्षण व सल्ला प्रकल्पाबद्दल कापूस व सोयाबीन पिकाकरीता 1 हजार 344 थेरोमन सापळे (कामगंध सापळे) व 7 हजार 296 स्पोडो त्पेराही उपविभागीय स्तरावर उपलबध करुन देण्यात आला आहे. तसेच विभागीय स्तरावरुनही किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
सोयाबीन पिकांवर उंट अळी , तंबाखूवरील पाने खाणारी अळी व चक्रभुंगा किडीच्या नियंत्रणासाठी जैवीक व रासायनीक औषधांचा निश्चितच लाभ होणार आहे. शेतक-यांनीही किड नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना करावेत तसेच तालुका कृषि अधिकारी यांचेकडून बिव्हेरीया, बॅसीयाना या जैविक किटक नाशकाची मागणी तात्काळ नोंदवावी त्यामुळे सोयाबीन पिकाचे संरक्षण करणे निश्चितच सुलभ होणार आहे.
0000
No comments:
Post a Comment