वर्धा, दि.22- सैनिक कल्याण विभागाचे निर्देशानुसार सैनिक कल्याण कार्यालयातर्फे माजी सैनिकांच्या पाल्यांकरीता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.
ज्या माजी सैनिकांचे पाल्य इयत्ता दहावी व बारावी मध्ये आणि पदवीका किंवा पदवी व पदव्यूत्तर परीक्षेमधे अंतीम वर्षी 60 टक्क्यापेक्षा जास्त गुण घेवून उत्तीर्ण झाले असतील अशा माजी सैनिकांनी नविन शिष्यवृत्तीसाठी व मागील वर्षी शिष्यवृत्ती घेतलेल्या माजी सैनिकांनी जुन्या शिष्यवृत्तीसाठी दि. 10 ऑक्टोंबर 2012 पर्यंत आले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय वर्धा या कार्यालयात सादर करावेत.
ज्या माजी सैनिकांनी वर्ष 2009-2010, 2010-11 प 2011-12 मध्ये पंतप्रधान शिष्चृत्ती योजने अंतर्गत शिष्यवृत्ती घेतली होती. अशा माजी सेनिकांनी सुध्दा दिनांक 10 ऑक्टोंबर 2012 पर्यंत या कार्यालयात येवून आपले फॉर्म भरावे जेने करुन आपले फॉर्म पुढील कार्यवाही करीता पाठविता येतील. लाभार्थी माजी सैनिकांनी सैनिक कल्याण कार्यालयात येताना आपले ओळख पत्र, अर्ज, पाल्याचा शिकत असल्याचा दाखला व मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याची मार्कलीस्ट घेवून यावी. ज्या पाल्यांनी सीईटी किंवा इतर कारणासाठी गॅप घेवुन शैक्षणिक वर्ष 2012 -13 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे. अशा पाल्यांनी (प्रतीज्ञा पत्र) घेवून यावे. तरी वरील योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन फ्ला. ले.धनंजय य. सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment