वर्धा,दि.2- वर्धा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक येत्या 7 फेब्रुवारी 2012 रोजी होणार आहे. या निवडणूकीसाठी नागरिकांनी आपले उमेदवारी अर्ज 30 जानेवारी 2012 रोजी मागे घेतल्यानंतर रिंगणात असलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहे. तालुकानिहाय जिल्हा परिषदेचे उमेदवारांची संख्या कंसाबाहेरील दिलेले असून, कंसातील उमेदवार हे पंचायत समितीचे उमेदवर असतील.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे तालुकानिहाय उमेदवार वर्धा 68(121), प्रत्येकी एक उमेदवार अपील मध्ये आहे. सेलू 23(58), जि.प.3 अपीलमध्ये आहे. देवळी 32 (48), आर्वी 35 (61) आष्टी 18(38), कारंजा 26(43), जि.प. एक उमेदवार अपीलमध्ये आहे. हिंगणघाट 31 (84) जि.प.एक उमेदवार अपीलमध्ये आहे. समुद्रपूर 35 (74) असे एकूण जिल्हा परिषदेचे 268 व पंचायत समितीच्या निवडणूकीत 527 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
No comments:
Post a Comment