वर्धा, दि.1- निवडणूक आयोगाच्या दि. 3 जानेवारी 2012 चे पत्रानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार वर्धा जिल्ह्यात जिल्हा परिषद मधील 51 निवडणूक विभाग व पंचायत समिती मधील 102 निर्वाचन गणाचे निवडणूका दिनांक 7 जानेवारी 2012 रोजी घेण्याचे निश्चित झाले आहे.
पणन संचालक, महाराष्ट्र पुणे यांचे दि. 19 एप्रिल 1995 चे पत्रानुसार मतदानाचे दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश आहेत. जिल्ह्यातील 51 निवडणूक विभाग व 102 निर्वाचक गणाचे मतदार क्षेत्रात दिनांक 7 फेब्रुवारी 2012 ला मतदानाचे दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावे. सदर दिवशी भरणारा आठवडी बाजार तो दिवस बदलवून अन्य दिवशी भरविण्यास काहीच हरकत नाही. असे जिल्हाधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment