वर्धा, दि. 14- वर्धा जिल्ह्यातील मुख्यालयी व सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालये तसेच धर्मदाय आयुक्त व इतर न्यायालये व न्यायाधिकरणे येथे दिनांक ४ मार्च २०१२ रोजी महालोकअदालत भरविण्यात येणार आहे.
दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे व इतर प्रकरणे सामंजस्याने सोडविण्याकरीता न्यायाधीश वर्ग व तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ (पॅनल) आपणास मदत करेल.
न्यायालयात दाखल असलेली प्रकरणे महा-लोकअदालतीमध्ये ठेवणेकरीता संबंधितांनी आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा किंवा तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज करावा व दिनांक 4 मार्च 2012 रोजी आयोजित करण्यात येणा-या महालोकअदालतीमध्ये आपली जास्तीत जास्त प्रकरणे सामंजस्याने व आपापसात तडजोडीने सोडवावीत. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अ.श्रा.शिवणकर यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment