वर्धा,दि.13- साहित्य वाचन अलिकडील काळात लोप पावत चालली असून, या वाचन संस्कृतीला नवसंजिवन देणे आवश्यक आहे. साहित्य हे समाजातील सर्व घटकांना उपयुक्त असेच आहे. ग्रंथोत्सवामुळे साहित्याच्या अभिरुचीत वाढ होण्यासाठी येथे साहित्याचे दालन उपलब्ध केले असून, साहित्य वाचनातून अमृतानुभव स्विकारण्याचे आवाहन ज्येष्ठ साहित्यीक व लेखक किशोर सानप यांनी केले.
काल न्यु इंग्लिश हायस्कूलच्या प्रांगणात ग्रंथोत्सवाचे उदघाटन त्यांचे हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शेख हाशम होते तर मंचावर जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, विदर्भ साहित्य संघाचे वर्धेचे अध्यक्ष संजय इंगळे तिगांवकर, प्रदिप दाते व जिल्हा ग्रंथपाल सुरज मडावी उपस्थित होते.
मराठी भाषेच्या साहित्याच्या परंपरेत ज्ञानोबा, विठोबा, एकनाथ, नामदेव यांचे स्थान मोठे असून, योगदानही लक्षणीय असल्याचे सांगून सानप म्हणाले की, मराठी साहित्याला जात व धर्म नसतो. अभिसंतानी बहूजनांवर लादलेले साहित्य दिर्घकाळ टिकत नाही. मराठी भाषा हे जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे त्यामुळे त्याची व्यापकता अधिकाधिक दिसून येते.
मराठी भाषेच्या ज्ञानाच्या कक्षा वृध्दांवत असून, मराठी भाषा लोप पावेल ही सर्व साधारण लोकांना वाटणारी भिती निश्चितच चिंता करणारी नाही. काळानुरुप मराठी भाषेत संक्रमत झाले तरीपण जी भाषा सहजतेने बोलता व समजता येते तीच आपली माय बोली संपर्क भाषा म्हणून असते. समाजाच्या संस्कृतीन्वये भाषा बोलल्या जातात. मात्र त्या भाषेतही मराठी भाषा प्रामुख्याने असते. भाषेचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी अलिकडील युगात तंत्रज्ञानाचा सुध्दा वापर होत असतो परंतू बालपणावर कोरलेली मराठी भाषा प्रदिर्घ काळ टिकून राहत असते हे तेवढेच सत्य आहे.
वाचनाची संस्कृती वाढविण्यासाठी प्रत्येकांनी आपल्या उत्पन्नाचा 1 टक्का रक्कम पुस्तके खरेदीसाठी करण्यात यावा.मराठी साहित्याचे पुस्तके व ग्रंथ कपाटात अनेक वर्ष बंदीस्त असली तरी हे साहित्य सर्वकाळ जिवंत व टिकून राहते. मराठी भाषेची चिंता करण्याचे अजिबात कारण नसून, मराठी भाषेला व्यापकाता, सृजनशिलता मिळवून देण्यासाठी शासनाने घेतलेला उपक्रम निश्चितच गौरवपूर्ण आहे असेही ते म्हणाले.
अध्यक्ष पदावरुन बोलतांना प्रा. हासम म्हणाले की, मराठी भाषा संक्रमण अवस्थेतून जात आहे. पूर्वी अभिजनांनी बहूजनांवर थोपलेले भाषा दिर्घकाळ टिकाव धरु शकली नाही याकडे लक्ष वेधून मराठी भाषेची व्यापक संवर्धन, प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनाने घेतलेले उपक्रम अभिनंदनीय असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक करताना दैठणकर यांनी तीन दिवशीय कार्यक्रमाची माहिती विषद करुन ग्रंथोत्सवाच्या आयोजनाची भूमिका सांगितली.
ग्रंथोत्सवाचे उदघाटन दिप प्रज्वलाने झाले. तसेच साहित्य प्रदर्शन, बचतगट व खाद्य पदार्थाचे स्टॉलचे उदघाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्योती भगत व प्रा.अजय येते यांनी संयुक्तपणे केले. यावेळी मोठ्या संख्येने साहित्य प्रेमी व नागरीक उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment