वर्धा,दि.13-मराठी भाषा अधिक साहित्य समृध्द होण्यासाठी ग्रंथोत्सवात काल सायंकाळी कविसंम्मेलन संपन्न झाले. या कवी सम्मेलनात ज्येष्ठ कवियत्री पासून महाविद्यालयीन तरुण कवी सहभागी झाले होते. त्यांनी आपले कविमत यावेळी मोकळे केले. या कविसम्मेलनाचे अध्यक्ष प्रख्यात कवी अशोक बुरबुरे हे होते तर सुत्र संचालन संजय इंगळे तिगांवकर यांनी केले.
यावेळी मुकुंद देशपांडे यांनी संसारीक जीवनावर, जयश्री कोटगिरवार यांनी सैतानी सुनामी, संजय ओरके यांनी रोहणी महत्व व आपण, दिपक विरखेडे यांनी मुडद्याला कट मारतांना, शोभा कदम यांनी शेतकरी आत्महत्या, गंगाधर पाटील यांनी भेटीत शतभराची गझल, संजय भगत यांनी वाटेतून चालतांना छंद अगळा, प्रा. राजेश डंभारे यांनी मातृत्व, गार्गी गायधनी यांनी निसर्ग कविता, माधव तेलरांधे यांनी गाणे तूझीचे गाणे, अशोक बुरबुरे यांनी बाजारवेध, डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांनी शोध, प्रशांत ढोले यांनी जेथे, दिलीप गायकवाड यांनी पुन्हा एकदा, प्रशांत झिलपे यांनी भयभित, नंदा कुलकर्णी यांनी आपली बाग, प्रशांत दैठणकर यांनी चिमणी, यशवंत भवरे यांनी नुतन वर्ष , भुषण रामटेके यांनी तुटलेल्या लोकांची कविता व संजय इंगळे तिगांवकर यांनी दान या शिर्षकाच्या कविता सादर करुन उपस्थित कविप्रेमींना मंत्रमुग्ध केले.
यावेळी सर्व कवींचे स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला साहित्य प्रेमी उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment