वर्धा, दि.13 – राज्यात जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाला असून, राज्यात दिनांक 3 जानेवारी 2012 पासून आचार संहिता लागू करण्यात आली आहे व ती दिनांक 8 फेब्रुवारी 2012 पर्यंत अंमलात राहणार आहे.
त्यामुळे जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या निवडणूक आचार संहितेच्या कालावधीत माहे फेब्रुवारी 2012 मध्ये दि. 6 फेब्रुवारी 2012 सोमवारी होणा-या लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही. याबाबत जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment