वर्धा,दि.17- भारतीय डाक विभाग, वर्धा व्दारा दिनांक 30 डिसेंबर 2011 रोजी अधिक्षक डाकघर वर्धा
यांचे कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारीचे सहा आठवड्याचे आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारीची डाक अदालत मध्ये दखल घेतल्या जाईल.
विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वसतू , पार्सल, बचत बँक व मनी आूर्डर संबंधीच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.
तक्रारीचा उल्लेख सर्व तपशील सह केलेला असावा. संबंधीतांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधीक्षक डाकघर,वर्धा यांचे नावे दि. 23 डिसेंबर 2011 पर्यंत पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही. तक्रार कर्त्यांना डाक अदालतसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.असे अधिक्षक, डाकघर, वर्धा विभाग,वर्धा यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment