वर्धा,दि.17- टपाल खात्यातर्फे सुशिक्षित युवकांना टपाल अभिकर्ता होण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
सदर एजन्सी 18 वर्षे पूर्ण झालेल्या व 12 वी इयत्ता उत्तीर्ण असणा-या व्यक्तीला घेता येईल. या अंतर्गत सदर एजन्सीसाठी चांगली जागा असणे आवश्यक राहील. या ठिकाणी टपाल तिकिटे विकणे त्यासेाबतच रजिस्टर्ड पत्रांची नोंदणी तसेच मनी आूर्डर नोंदणी करणे आदींना येथे मंजूरी देण्यात येईल. यासाठी मंजूर दराने कमिशन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी टपाल खात्याच्या मुख्य कार्यालयातील अधिक्षकांशी संपर्क साधावा. असे आवाहन टपाल अधीक्षक यु.एम.शहादे यांनी एका प्रसिध्दीपत्राव्दारे केले आहे.
No comments:
Post a Comment