Thursday 15 September 2011

नऊ जलाशये 100 टक्के भरलेले


      महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक             जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.15 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------------
              
वर्धा,दि.15-वर्धा पाटबंधारे विभाग यांनी पाठविलेल्या अहवालानुसार आज दिनांक 1 सप्टेंबर 2011 रोजी जलाशयातील पाण्याच्या पातळीच्या स्थितीत सुधारणा झाली असून, नऊ जलाशये 100 टक्के भरलेली आहे.
     धाम महाकाली जलाशय, पोथरा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, पंचधारा प्रकल्प,मदन व मदन उन्नई प्रकल्प,लाल नाला प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प व सुकळी लघू प्रकल्प 100 टक्के भरलेली असून बोरप्रकल्प 96.94 टक्के,नांद प्रकल्प 91.23 टक्के, वडगाव प्रकल्प 96.11 टक्के, उर्ध्व वर्धा धरण 98.69 टक्के, निम्न वर्धा प्रकल्प 13.95 टक्के, बेंबाळा प्रकल्प 40.65 टक्के भरलेले आहेत.
     पोथरा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 16 सें.मी.ने 25.76 क्युसेस, डोंगरगांव प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 3 से.मी. ने 0.80 क्युसेस, पंचधारा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 5 से.मी. ने 2.44 क्युसेस,मदन सांडव्यावरुन 5 से.मी. ने 2.67 क्युसेस, मदन उन्नई धरणाच्या सांडव्यावरुन 10 सें.मी.ने 8.82 क्युसेस, वर्धा कार नदी प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 10 से.मी.ने 11.80 क्युसेस व सुकळी लघू प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 5 से.मी.ने 4.32 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.
     वडगाव प्रकल्पाचे 2 व्दार 15 से.मी. ने उघडले असून, त्यातून 28.87 क्युसेस , उर्ध्व वर्धा धरणातून 11 व्दारे 20 से.मी. ने उघडले असून, त्यातून 255 क्युसेस , निम्न वर्धा धरणाचे 28 व्दारे 10 से.मी. ने उघडले असून, त्यातून 145 क्युसेस, बेंबाळा प्रकल्पाचे      2 व्दार 10 से.मी. ने उघडले असून, त्यातून 19.20 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. असे अहवालात नमुद आहे.
                             00000


No comments:

Post a Comment