महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.493 जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.16 सप्टेंबर 2011
----------------------------------------------------------------------------------
वर्धा, दि. 16- शासन निर्णय दिनांक 5 जूलै 2011 अन्वये सन 2010-2011 च्या खरीप पिकांची पैसेवारी 50 पैसे वा त्यापेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे, जिल्ह्यातील आठ तालुक्यांची 1 हजार 111 गावामध्ये टंचाई परिस्थिती जाहीर करण्यात आली. अशा गावातील खातेदारांना टंचाई संदर्भात शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अनुज्ञेय सवलती देण्या संबंधी निर्देशित करण्यांत आले आहे.
तसेच, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 78 आणि महाराष्ट्र जमीन महसूल (कमी करणे, तहकूब करणे व सूट देणे) नियम 1970 चे नियम 5 मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान करण्यांत आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हयातील ज्या 1 हजार 111 गावामध्ये टंचाई परिस्थिती जाहीर करण्यांत आली आहे, तेथील खातेदारांना जमीन महसूलात सूट देण्यांत येत असते असे निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशात नमूद आहे.
No comments:
Post a Comment