Saturday 6 August 2011

आमदार सुरेश देशमुख यांच्या हस्ते 2 लक्ष 40 हजाराचे धनादेश लाभार्थ्यांना वितरीत


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र. 380        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.6 ऑगस्ट 2011
--------------------------------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.6- येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहांत आज वर्धेचे आमदार सुरेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कुंटुंब अर्थसहाय्य योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजना आदी योजनेच्या दक्षता समितीचे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी आमदार देशमुख यांच्या हस्ते 2 लक्ष 40 हजाराचे धनादेश योजनेच्या लाभार्थ्यांना वितरीत करण्यांत आले.
या प्रसंगी जि.प.उपध्यक्ष सुनिल राऊत उपविभागीय अधिकरी हरीष धार्मिक, तहसिलदार शुशांत बन्सोडे, नायब तहसिलदार नारायण ठाकरे पं.स.सदस्य पवन गोडे आदीमान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना आमदार देशमुख म्हणाले की धान्य घरपोच योजना ही शासनाची महत्वांची योजना असल्यामुळे ती तातडीने गावांपर्यंत राबविण्यांत यावी या योजनेमुळे अल्प उत्पन्न गटांतील व अंत्योदय योजनेतील कुंटुंबाना फार मोठा दिलासा मिळतो. ही योजना अधिक गतीमान करण्यांसाठी ग्रामीण भागांमध्ये ग्राम सभे मधून गांवक-यांना प्रबोधन करुन अधिकधिक या योजनेचा लाभ लाभार्थ्या पर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले सिधापत्रिका जिर्ण किंवा खराब झाल्या असतील अश्या सिधापत्रिका धारकांना त्या तातडीने बदलून देवून नविन सिधा पत्रिकेचे वितरण करण्यांत यावे. तसेच शासकीय योजनेचा लाभ गरीब जनतेला वेळेवर मिळावा यासाठी प्रयत्न करावा बचत गटांना स्वस्त धान्य दूकान देण्याबाबत शासनाने धोरण जाहीर केले असून ज्या बचत गटांना स्वस्त धान्य दुकान देण्यांत येतील अश्या बचत गटांना एकाच वेळी स्वस्थ  धान्य दुकानाचे असे    परिपूर्ण असे प्रशिक्षण देण्यात यावे असेही ते म्हणाले. प्रस्थावित करतांना तहसिलदार बन्सोडे म्हणाले की शासनाने राष्ट्रीय कुंटुंब अर्थसहाय्य योजना, इंदिरा गांधी, वृध्दपकाळ योजना, श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेसाठी पूरेसा निधी दिला असून त्यातून 24 लाभार्थ्यांना 2 लाख 40 हजाराचे धनादेश वितरीत करण्यांत आले आहे. अजून 16 लाभार्थ्यांना लाभ देण्यांत येणार आहे. वर्धा तालूक्यांत 5 गावांना घरपोच धान्य वितरण योजनेचा लाभ देण्यांत असून येत्या महिण्यांत 20 गावांमध्ये धान्य घरपोच वितरण योजनेचे उदिष्ट ठरविण्यांत आले आहे.घरपोच धान्य योजने अंतर्गत अंत्यदोय कार्ड धारकांच्या लाभार्थ्यांना तिन महिण्याचे धान्‍य उचल करावे लागणार असून लाभार्थ्याना प्रत्येक महिण्यात 44 किलो धान्य देण्यांत येणार आहे यात 35 किलो धान्य अंतोदय योजनेच्या दराने व 9 किलो धान्य दारीद्र रेषेखालील योजनेच्या दराने देण्यांत येणार आहे घरपोच योजने बाबत ग्रामीण स्तरावर प्रबोधनात्मक जाणीव जागृती महसूल विभागाच्या मार्फत करण्यांत येत असून या योजना गतीमान करण्यांचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी इतिवृत्तांताचे वाचन नायब तहसिलदार ठाकरे यानी केले या प्रसंगी मोठया संख्येने समंधीत योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment