Friday 4 June 2021

 प.क्र- 406                                                                    दि.4.06.2021

 

शेतक-यांनी बियाणे व रासायनिक खताच्या तक्रारी आपले सरकार पोर्टलवर नोंदवाव्या

    वर्धा ,दि 4 जून :-जिल्हयात  शेतक-यांकडून  सुरु झालेल्या खरीप हंगामासाठी विविध कंपन्याच्या वेगवेगळया वाणाचे  सोयाबिन  बियाणे व रासायनिक खताची  खरेदी सुरु आहे.  मागील वर्षी सोयाबीन बियाणे उगवणीबाबत  मोठया प्रमाणात जिल्हयात तक्रारी  झालेल्या  होत्या.  पर्यायाने शेतक-याचे नुकसान देखील झाले होते. यावर्षीही शेतक-यांनी खरेदी केलेल्या  सोयाबीन बियाण्याच्या उगवणीच्या तसेच खताच्या खरेदीबाबत शेतक-यांना   काही तक्रारी असल्यास जिल्हयात कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आलेले असल्यामुळे  आपले सरकार  या पोर्टलवर  ऑनलाईन तक्रार नोंदवावी असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.

                                                0000

No comments:

Post a Comment