Monday 31 May 2021

 

..क्र- 394                                                                    दि.31.05.2021

शेतक-यांनी विक्रीस आणलेल्या मालाच्या प्रतवारी सबंधात

 तक्रार असल्यास  बाजार समितीच्या सचिवाशी संपर्क साधावा

          वर्धा, दि 31 (जिमाका ):-  आधारभुत दराने नाफेडच्या वतीने चना विक्री करण्यासाठी 17 मे पर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या शेतक-यांनी 25 जुन पर्यंत जिल्हयातील 10  केंद्रावर चना विक्री करण्यास आणावा. बाजार समितीत चना विक्रीस आणल्यानंतर   जर शेतक-यांना  त्यांच्या शेतमालाच्या प्रतवारी सबंधात  व पर्यायाने बाजार भावासंबधी  शंका  अथवा तक्रार असल्यास  बाजार समितीच्या सचिवांशी  तसेच सबंधित सहाय्यक निबंधक यांचेशी संपर्क साधुन  शेतमालाची गुणवत्ता तपासुन  घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी  केले आहे.

          जिल्हयातील नोंदणीकृत शेतक-यांनी  अद्यापही चना विकला नाही.  अशा शेतक-यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह  (ज्या शेतक-यांना एस.एम.एस. प्राप्त झाले आहेत अशा ) 25 जुन पर्यंत  आपला चना  सबंधित तालुक्यातील जवळच्या   नाफेड खरेंदी केंद्रावर  विक्रीस आणावा.

          केंद्र शासनाच्या निर्णयानुसार  जिल्हयातील वर्धा, हिंगणघाट, सेलू व आर्वी बाजार समित्यांचा ई-नाम  मध्ये समावेश करण्यात आलेला असुन  या बाजार  समितीत   शेतमालाची शास्त्रीय  पध्दतीने प्रतवारी , दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळा  उभारण्याचे काम प्रगतीपथावर  आहे. या चारही व उर्वरित तीन्ही बाजार समितीचे  आवारात इतर प्रकारचा शेतमाल  विक्रीसाठी आणल्यांनतर  जर एखादया   शेतक-यांना  त्याच्या मालाच्या  प्रतवारी संबधात   शंका असल्यास   बाजार समिती आर्द्रता  मिटरच्या सहाय्याने शेतमालाची आर्द्रता  तसेच गुणवत्ता निकषाची पडताळणी करुन देईल असे,  जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी कळविले आहे.

                                                000

No comments:

Post a Comment