.प.क्र- 395 दि.31.05.2021
जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल
जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी
Ø 1
जून ते 15 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू
Ø वर्धा,
हिंगणघाट व पुलगाव नगरपालिका आणि लगतच्या ग्रामपंचायत मध्ये इतर दुकाने ठरलेल्या दिवशी
Ø जिल्ह्यातील
इतर ग्रामीण भागात अत्यावश्यक व इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत
Ø शनिवार,
रविवार औषधी दुकाने वगळता सर्व दुकाने राहणार बंद
वर्धा, दि 31 मे (जिमाका):- संपुर्ण वर्धा जिल्हयात कोरोना विषाणुचा सकारात्मक
दर 10टक्के पेक्षा कमी असल्याने आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड 40टक्के पेक्षा कमी भरलेले
असल्याने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेश
1 जून सकाळी 7 वाजता पासुन 15 जून सकाळी 7
पर्यंत लागू राहतील.
वर्धा नगर पालीका व लगतच्या 11 ग्रामपंचायती,
पुलगांव नगर पालिका, व लगतच्या 2 ग्रामपंचायती, हिंगणघाट नगर पालीका व लगतच्या 4 ग्रामपंचायत,
या क्षेत्रामध्ये सर्व अत्यावश्यक वस्तु व सेवा यांची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी
7 ते दुपारी 1वाजेपर्यंत चालु ठेवण्यास परवानगी राहील. तसेच इतर सर्व दुकाने
व सेवा सोमवार, मंगळवार, व बुधवार या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत चालु ठेवण्यास
परवानगी राहील. याशिवाय जिल्हयातील उर्वरीत
भागात सर्व अत्यावश्यक तसेच इतर सर्व प्रकारची वस्तु व सेवा यांची दुकाने (फक्त स्वतंत्र
/ एकल दुकाने, मॉल्स मधील अथवा शॉपिंग सेटर नाही) सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीत चालु ठेवणेस परवानगी
राहील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले
आहेत.
प्रत्येक दुकानदार व ग्राहकांनी मास्क लावणे
बंधनकारक राहील. प्रत्येक दुकानासमोर हॅन्ड वॉश सुविधा किंवा सॅनिटायझर असणे आवश्यक
राहील. दुकानाबाहेर ग्राहकांसाठी शारीरिक अंतर राहण्यासाठी खुणा करण्यात याव्या. दुकानदारांनी
वेळोवेळी दुकानाचे परिसर निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. दुकानात एकावेळी एकाच ग्राहकास
प्रवेश राहील.
हॉटेल,
शिवभोजन घरपोच सुविधा सुरू
हॉटेल,
रेस्टॉरंट,खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत
सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी
येथे स्वत: जावुन पार्सल घेता येणार नाही. सदर ठिकाणी ग्राहक आढळुन आल्यास संबधीत आस्थापनेवर
कायदेशीर कारवाई केली जाईल.
जिल्हायात ई-कॉमर्स द्वारे अत्यावश्यक वस्तुसह
अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंच्या पुरवठयास परवानगी देण्यात आली आहे.
वैद्यकीय सेवा व इतर आणिबाणीची परिस्थिती वगळता सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजे नंतर तसेच शनिवार व रविवार( पुर्णत:) सर्व
प्रकारच्या हालचालींवर, येण्या जाण्यावर निर्बंध असतील.
रस्त्यावर
खाद्यपदार्थ विकण्यास मनाई
रस्त्यावरील सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या
विक्रीस मनाई (बंदी) असेल. नगरपालीका / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी फेरीवाले, भाजी
विक्रेते व फळ विक्रेते यांनी न.पा. /स्था.स्व.सं. यांचे द्वारे ठरवून दिलेल्या वॉर्ड
/ परिसरा मध्येच सदर व्यवसाय फिरुन करावा.(ठरवून दिलेल्या जागे शिवाय इतर ठिकाणी व्यवसाय
करु नये)
शासकीय
कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरू
कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषी, बँक,
मान्सुनपुर्व कामांशी संबंधित यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत यंत्रणा, कार्यालये
पुर्ण क्षमतेने सुरु राहतील, या व्यतीरिक्त इतर सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये
ही 25 % कर्मचारी उपस्थितीसह सुरु राहतील. तथापी कार्यालय प्रमुखाने 25 % पेक्षा जास्त
उपस्थिती बाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास विनंती केल्यास तशी परवानगी देण्यात
येईल.
पेट्रोल
पंप
नागरी
व ग्रामीण भागातील सर्व पेट्रोलपंप सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु राहतील.
दुकानांना / आस्थापनांना पुरवठा केला जाणाऱ्या वस्तुंच्या
वाहतुकीवर कोणतेही निबंध राहणार नाही. मात्र दुकानांना ठरवुन दिलेलया वेळे नंतर ग्राहकांना
विक्री करता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना माहामारीच्या आपत्ती जोपर्यंत
अस्तीत्वात आहे तो पर्यंत संबधीत दुकान बंद ठेवण्यात येईल, तसेच या पुर्वी निर्गमीत
आदेशा प्रमाणे दंड आकारण्यात येइल.सर्व उद्योग, व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे
कर्मचाऱ्यांना निगेटीव्ह RTPCR चाचणीअहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. (वैधता 15 दिवसांकरीता)
निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवालाशिवाय दुकान / व्यवसाय सुरु करता येणार नाही.
सदर निर्देशांचे काटेकोर अमलबजावणी करण्याची
जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधीत नगर पालिका / नगर
पंचायतीचे मुख्याधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी
तहसिलदार यांची राहील.
आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने
भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे
कलम 51 ते 60 नुसार शिक्षेसपात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबधीतावर
सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.
00000
No comments:
Post a Comment