Tuesday 1 June 2021

 

प.क्र- 397                                                                    दि.1.06.2021

                         शेतक-यांनी पीक स्पर्धेत सहभाग नोंदवावा

Ø मुंग व  उडिद पिकासाठी अंतिम मुदत 31 जुलै तर इतर पिकासाठी 31 ऑगस्ट 

     वर्धा, दि 1 जून (जिमाका ):-  पिकांची उत्पादकता  वाढविण्यासाठी  विविध भागातील शेतक-यांकडुन विविध प्रयोग  करण्यात येतात. अशा शेतक-यांना  मिळालेल्या उत्पादकतेबाबत  प्रोत्साहन  देण्यासाठी   व त्यांचे मनोबल वाढवून इतर शेतकाऱ्यांमध्ये  स्पर्धा निर्माण होण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेक-यासाठी पीक स्पर्धा  योजना राबविण्यात येत असून  या खरीप हंगाम पीक  स्पर्धेत शेतक-यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.

        अधिक उमेदीने  नवनवीन  अद्यावत  तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱयांनी करावा आणि उत्पादनात  वाढ करावी यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्याच्या  उत्पादानात मोलाची भर  पडेल.

            पिकस्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत  धरण्यात येईल, खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर,  मुग, उडिद,  सोयाबिन, भुईमुग, सूर्यफुल अशा एकुण 11 पिकाचा  स्पर्धेत  समाविष्ट करण्यात आला आहे. प्रती तालुका किमान स्पर्धक संख्या –सर्वसाधारण गटासाठी 10 आर क्षेत्रावर  सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर सबंधित पिकाची पीक स्पर्धा  संबधित तालुका कृषि अधिकारी जाहिर करतील.  तालुक्यात पीक कापणी प्रयोग  घ्यावयाची किमान  संख्या सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी  गटासाठी 4  राहील.  स्पर्धेत भाग घेणा-या  शेतक-याला एकाच  वेळी  एकापेक्षा  जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.  प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पिकनिहाय  प्रत्येकी  300 रुपये असणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी  मुग व उडिद पिकासाठी 31 जुलै व  भात, ज्वारी, मका,  नाचणी, तुर, सोयाबीन व भूईमुगासाठी 31 ऑगस्ट असा राहील. स्पर्धेत सहभाग नोंदवू   इच्छिणा-या  स्पर्धकांनी   विहित नमुन्यात  अर्ज भरुन त्यासोबत  ठरवून दिलेले प्रवेश शुल्काची चलन, 7/12 , 8 अ चा उतारा  व जात प्रमाणपत्र  ( केवळ आदिवासी असल्यास ) सादर करावे.

            तालुका स्तरावर प्रथम पुरस्कार 5 हजार रुपये, व्दितीय  3 हजार रुपये  व तृतीय 2 हजार रुपये  जिल्हास्तरावर  प्रथम  10 हजार रुपये, व्दितीय  7 हजार रुपये व तृतीय 5 हजार रुपये ,  विभाग स्तरावर  प्रथम  25 हजार रुपये, व्दितीय  20 हजार रुपये व  तृतीय 15 हजार रुपये तर  राज्य स्तरावर  प्रथम  50 हजार रुपये, व्दितीय 40 हजार रुपये व तृतीय 30 हजार रुपये असा असणार आहे. अधिक माहितीसाठी  कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे कृषि विभागाने कळविले आहे.

                                                                  000

प.क्र- 398                                                                    दि.1.06.2021

         नागरिकांना अवैध दारु विक्रीची माहिती असल्यास टोल फ्री क्रमांकावर

                            किंवा   ऑनलाईन तक्रार नोंदवावी

                                                       -राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक

 

         वर्धा, दि 1 (जिमाका ):- जिल्हयातील नागरिकांना  आपल्या परिसरात  होत असलेल्या अवैध, भेसळयुक्त व बनावट दारु विक्रीची माहिती असल्यास त्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवावी. यासाठी  गुगल फॉर्मवर https://forms.gle/6ozwfU5u76zah2eG6 या लिंक वर  तसेच राज्य स्तरावरील  18008333333 या टोल फ्री क्रमांकावर,  8422001133 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा  अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क  कार्यालयाच्या  07152-240163 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सागर धामोरकर यांनी  केले आहे.

                                                000

No comments:

Post a Comment