Thursday 17 March 2016

जलजागृती सप्‍ताहः
  पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी पुढाकार घ्या
-        आशुतोष सलिल
Ø जलदिंडी,नद्यांच्या जलपूजनाने जलजागृती सप्ताहाचा प्रारंभ
Ø वर्धा जलसिंचन पुस्तिकेचे मान्यवरांच्याहस्ते विमोचन
Ø जलप्रतिज्ञा करून जल संवर्धनाचा केला संकल्प
Ø पाणी व्यवस्थापनावर जलतज्ञ डॉ. फडके, डॉ.ने यांचे मार्गदर्शन
       वर्धा, दिनांक 16 –  पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रत्येकाने सामोरे यावे. जल जागृती सप्ताह हा शासनापुरता मर्यादित राहता, व्यापकप्रमाणात लोकांचा सहभाग यामध्ये वाढावा. लोकांनी या सप्ताहाचे महत्त्व ओळखून पाणी हेच जीवन आहे. त्याच्या वापराचे योग्य नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले.
           जागतिक जल दिनानिमित्त आयोजित जल जागृती सप्ताहाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, राज्य जल सिंचन आयोगाचे माजी सदस्य डॉ. उल्हास फडके, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. दत्तात्रय वने, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयवंत गवळी, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शंकर मंडवार, कार्यकारी अभियंता सु. . ढवळे, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमित मेश्राम, निम्न वर्धा प्रकल्पाचे श्री. रब्बेवार, श्री. गहलोत यांची उपस्थित होते.
          उद्घाटनपर कार्यक्रमात वर्धा, धाम, बोर, पंचधारा, पोथरा नदीच्या जलाचे पूजन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते करण्यात आले. जलप्रतिज्ञेचे सामुहिक वाचन वर्धा सिंचन पुस्तिकेचे विमोचनही  यावेळी मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. प्रारंभी जानकीदेवी बजाज संस्थेच्या परिसरातून विकास भवनपर्यंत जलदिंडी काढण्यात आली. यामध्ये भजनीमंडळाचाही समावेश होता.  
          जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले, नदी, धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. बीड, लातूर आणि उर्वरीत मराठवाड्यातही चिंतेची बाब असून प्रत्येक नागरिकाने पाण्याचा ताळेबंद समजावून घ्यावा. पाण्याचे महत्त्व ओळखावे. मोजूनमापून पाण्याचा वापर करावा. पाऊस संकलन, पुनर्भरण, नळावर मीटर बसविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. जलसंवर्धनासाठी सर्वांनीच पुढे येणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार अभियान 201 गावांमध्ये राबविण्यात येते आहे. पाण्याच्या वापराच्या योग्य नियोजनाबरोबरच पाटबंधारे विकास महामंडळाने प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या बाधितांना योग्य मोबादला देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. तसेच या प्रकल्प बाधितांबद्दल कृतज्ञ राहून त्यांच्या जागेचा योग्य मोबदला देण्यात यावा, तरच या सप्ताहाची यशस्वीतता अधिक प्रभावी राहील, असे सांगितलेजिल्ह्यातील तालुका-तालुका पातळीवर पाण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात यावे. पाणी हेच जीवन असून प्रत्येकाने पाण्याची बचत, काटकसर करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
           जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी वातावरणातील बदल दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. सर्वांनी निसर्ग संवर्धनासह पाणी बचतीचा विचार करावा. पाणी हे अनमोल असून त्याच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रत्येकामध्ये पाणी वापराबाबत जागृती निर्माण करावी, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सुजलाम सुफलाम धरणी मातेसाठी पाणी अत्यावश्यक असून त्यावरच सृष्टीचा डोलारा उभा आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले.
            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा यांनी पाण्याचे महत्त्व विषद करणारी कविता सादर करून पाणी बचतीचा संदेश दिला. तसेच जलसंवर्धनासाठी तालुकास्तरावरही जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगून पाणी बचतीची लोकचळवळ उभी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. जलतज्ञ डॉ. फडके, डॉ. वने यांनीही पाणी बचतीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करून पाण्याचा अपव्यय टाळावा. पाण्याचे माहात्म्य ओळखावे. पाण्याचा वार्षिक ताळेबंद आखण्यात यावामोठ्याप्रमाणात देशात जलसंचयाला महत्त्व देऊन जलसंचय वाढविल्यास देश जगातील महासत्ता होईल, असेही त्यांनी सांगितले. पाणी संवर्धनासाठी धरणे झालीच पाहिजेत असे सांगून उमरी मेघे येथील 24 तास पाणी पुरवठ्याबाबत, मीटरींगबाबतही त्यांनी कौतूक केले. तसेच असे प्रयोग राज्यभर व्हावेत. त्यातून पाण्याची, विजेची बचत होण्यास मदत होईल, असे सांगितले.
           यावेळी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक नितीन महाजन यांनीही विपरित भूपृष्ठीची स्थिती, भूशास्त्रीय स्थिती, भूजल नियमन कायदा, पावसाची अनियमितता, जनतेची मानसिकता, पावसाच्या पाण्याचे संकलन, नियोजन आणि व्यवस्थापन यावर सादरीकरण केले.
                  कार्यक्रमाच्या सुरूवातीला जलप्रतिज्ञेने जलसंवर्धनाचा संकल्प सर्वांनी केला. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते जलदेवता, जलकलशाचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत श्री. मंडवार यांनी स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन केले. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था आणि संस्थेच्या कार्याबाबत, जलनियोजनाबाबत संस्थेचे विनेश काकडे यांनीही सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक   अधीक्षक अभियंता जयवंत गवळी यांनी करून जलजागृती सप्ताहानिमित्त राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. तसेच विभागनिहाय सादरीकरण करण्यात आले. पाणी बचत- जनजागृती चर्चासत्र यामध्ये पाणी संवर्धनावर विचारमंथन करून जलसंवर्धना संकल्प करून कार्यक्रमाचा समारोप झाला.  
वाल्मीतर्फे आजपासून दोनदिवसीय कार्यशाळा
विकास भवन येथे औरंगाबादच्यावाल्मीमार्फत महिला बचत गट महिला लाभधारकांची सिंचन व्यवस्थापन जलसाक्षरता यामध्ये महिलांचा सहभाग या विषयावर दिनांक 17 18 मार्च रोजी दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दिनांक 17 मार्च रोजी
आर्वी, देवळी, हिंगणघाट, सेलू वर्धा तालुकास्तरीय जलजागृती स्पताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे      आयोजन करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment