वर्धा, दिनांक 5 – स्थानिक स्वराज्य संस्था
च्या राखीव प्रभागातून निवडणूक लढवू इच्छिणा-या मागासवर्गीय उमेदवारांच्या जाती
दावा पडताळणीबाबत दिनांक 31 डिसेंबर 2013 पर्यंत होणा-या ग्रामपंचायत निवडणूकीत
निवडून आलेल्या उमेदवारास 6 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक
करण्यात आले आहे.
दिनांक 31 डिसेंबर 2013 पर्यंत होणा-या
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी इच्छूक मागासवर्गीय उमेदवारांचे जात पडताळणीचे अर्ज
निवडणूकीचे नामनिर्देशनपत्र भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे स्विकारण्यात
येतील. असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment