वर्धा,दि.5- जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेचा
प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 16 नोव्हेंबर 2012 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम
सन 1951 च्या कलम 34 कलम लागू करण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार
यांनी जारी केला आहे.
मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 कलम 33,35,42 व 47 अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास हा आदेश अंमलात
असेपर्यंत वर्धा जिल्ह्यात जाहीर सभा,
निदर्शने , मोर्चे, शोभायात्रा आदीबाबत पोलीस स्टेशन अधिका-यांकडून परवानगी घेतल्याशिवाय आयोजीत करु नये. तसेच
शांततेला व सुव्यवस्थेला बाधा आणणा-या घोषणा देऊ नये असेही आदेशात नमूद केले
आहे.
00000
No comments:
Post a Comment