बाल पत्रिकेचे उदघाटन करताना जिल्हाधिकारी जयश्री भोज |
वर्धा,दि.12–राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राज्यात 14 नोव्हेंबर 2011 पासून राबविल्या जात आहे. जिह्यातील सर्व बालकांचे कुपोषण कमी करुन त्यांना साधारण श्रेणीत आणण्यासाठी व या कार्यात लोकसहभाग मिळावा व त्याबद्दलची माहिती लोकांना व्हावी यासाठी जिल्हास्तरावर आरोग्य विभाग व एकात्मिक बालविकास विभागामार्फत बाल पत्रिकेचे उदघाटन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांचे हस्ते नुकतेच (29 फेब्रुवारी 2012) रोजी करण्यात आले. या पत्रिकेव्दारे 0 ते 6 वयापर्यंतच्या मुलांना आहार कोणता, कसा व किती वेळा द्यावा ही माहिती देण्यात आली आहे. वयानुसार बाळाचे आदर्श, वजनाची माहिती तसेच कुपोषण टाळण्यासाठी वापरण्यात येणा-या दशपदिबद्दल माहिती मिळणार आहे.
प्रत्येक बालकांच्या वजनाची नोंद दर महिण्यात त्या पत्रकावर घेण्यात येणार असून, वजनाप्रमाणे बाळाच्या श्रेणीची माहिती प्रत्येक बालकांच्या पालकांना मिळणार आहे. या पत्रकाव्दारे कुपोषणाबाबतीची माहिती तसेच उपाययोजना व त्यावर करावयाची अंमलबजावणी लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम होईल व त्यातुन लोकांचा सहभाग कुपोषण मुक्तीच्या कार्यात वाढेल अशी अपेक्षा आहे. असे आवाहन जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment