Tuesday 31 October 2017



न्यास नोंदणी बाबत 30 दिवसाचे आत हरकती सादर करावे
वर्धा, दि 31 (जिमाका)   सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत असलेल्या अनेक  निष्क्रीय संस्थाची नोंदणी रद्द करणेसाठी सहायक धर्मादाय आयुक्त यांनी चौकशी सुरु केली आहे.  न्यासांनी नोंदणी झाल्यापासुन पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीपासुन न्यासांची हिशोबपत्रके दाखल केली नाहीत.  होणारे बदल अर्ज सादर केलेले नाहीत, तसेच आजपर्यंत काही न्यासांनी मुळ नोंदणी प्रमाणपत्र सादर केले नाही.  अशा संस्थांनी    न्यास नोंदणी बाबत काही हरकती घ्यावयाची असल्यास किंवा पुरावा दयायचा असल्यास लेखी स्वरुपात 30 दिवसाचे आत सादर करावे, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त यांनी केले आहे.
मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा  विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत हरकती न आल्यास संबंधित न्यासाचे काही म्हणने नाही  असे समजुन चौकशी पुर्ण करुन  योग्य ते आदेश पारित केल्या जाईल. तसेच सदर प्रकरणात पुढील कोणतीही तारीख दिली जाणार नाही. ज्या न्यासांची नोंदणी रद्द करण्यात येईल त्यांची यादी कार्यालयाचे सुचना फलकावर व धर्मादाय संघटनेच्या charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. असे सहायक आयुक्त धर्मादाय आयुक्त यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment