Friday 5 February 2016

                                 महात्‍मा फुले महामंडळाकडून कर्जाची
परतफेड करणा-या लाभार्थीचा सत्‍कार

                वर्धा,दि.4-  महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या) वर्धाकडून  व्‍यवसायाकरीता कर्ज घेऊन कर्जाची नियमित परतफेड करणा-या जोत्‍सना उरकुडे रा. हिंगणी ता. सेलू, सविता उरकुडे, रा. हिंगणी ता. सेलू,  प्रिती टेंभरे, रा. दहेगाव (गो.) ता. सेलू  आणि शरद ताकसांडे रा. मु. पो. सेवाग्राम, ता.जि. वर्धा यांचा प्रजासत्‍ताकदिनी जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांच्‍याहस्‍ते पारितोषिक व प्रोत्‍साहन प्रमाणपत्र देऊन सत्‍कार करण्‍यात आला.  
                                                                              0000
पर्यावरण समतोलासाठी वृक्ष लागवड आवश्यक
– मोहन गुजरकर
          वर्धा,दि.4 - पर्यावरणावर दिवसेंदिवस ताण वाढल्‍याने पर्यावरणाचा समतोल साधण्‍यासाठी वृक्ष लागवड महत्त्वाचे आहे. त्‍यासाठी सर्वांनी स‍हकार्य करण्‍याची गरज आहे. पर्यावरण संरक्षणासाठी छोट्या, छोट्या उपायांची  मोठी मदत होणार, असे प्रतिपादन जिल्हा समादेशक प्रा. मोहन गुजरकर यांनी केले.
               जिल्‍हास्‍तरीय वक्‍तृत्‍व,निबंध अणि चित्रकला स्‍पर्धांच्‍या पुरस्‍कार समांरभात प्रमुख पाहुणे म्‍हणून ते बोलत होते. जिल्‍ह्यातील सर्व प्राथमिक,माध्‍यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्‍ये पर्यावरण, वृक्षसंवर्धन व जलसंवर्धनाविषयीचे जाणीव जागृती व्‍हावी. सामाजिक वनीकरण विभागाच्‍या वृक्ष लागवड,पडित जमीन विकास, जल संवर्धन कार्यक्रमात त्‍यांचा सक्रिय सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्‍हास्‍तरीय निबंध,चित्रकला व वकृत्‍व स्‍पर्धांमध्‍ये विजयी ठरलेल्‍या स्‍पर्धकांना पारितोषिक प्रदान करण्‍यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून सेवाग्राम आश्रम परिसरातील यात्री निवासी येथे आयोजन करण्यात आले होते.
              निबंध स्‍पर्धकांसाठी विद्यार्थ्‍यांचे विद्यालयीन व महाविद्यालयीन असे दोन गट करण्‍यात आले. माध्‍यमिक गटासाठी ‘स्‍वच्‍छता अभियानात माझी भूमिका’ तर महाविद्यालयीन गटासाठी ‘जागतिक तापमान वाढ व हवामानातील बदल’ असे विषय ठरवून देण्‍यात आले होते. चित्रकला स्‍पर्धा अंतर्गत प्राथमिक गटासाठी ‘मी पाहिलेला जंगलातील प्राणी’ माध्‍यमिक गटासाठी ‘माझी हरीत शाळा’ तर महाविद्यालयीन गटासाठी ‘बदलेल्‍या ऋतू चक्राचे परिणाम’ विषय होते. वक्‍तृत्‍व स्‍पर्धेकरीता माधमिक गटांना ‘पर्यावरण स्‍नेही जीवनशैली’ आणि म‍हाविद्यालयीन गटासाठी ‘जल प्रदुषणाची समस्‍या व त्‍यावरील उपाय’ विषय देण्‍यात आले होते. निबंध व चित्रकला स्‍पर्धा शाळा,महाविद्यालयीन पातळीवर घेण्‍यात आली.  वक्तृत्व स्‍पर्धा प्रथम तालुका पातळीवर आयोजित करुन प्रत्‍येक गटातील प्रथम व व्दितीय क्रमांकाचे विद्यार्थ्‍यांना जिल्‍हापातळीवर बोलावून त्‍यांची वक्‍तृत्‍व स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली. वक्तृत्व स्‍पर्धेच्या कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष पूजन व दीप प्रज्‍वलनाने करण्‍यात आली. सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक पी.एच.बडगे यांच्याहस्ते करण्‍यात आले. वक्‍तृत्‍व स्‍पर्धेकरीता विद्यालयीन गटात 13 व महाविद्यालयीन गटात 8 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्‍येक गटात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकासाठी विजेत्‍यांची निवड करण्‍यात आली.
             निबंध लेखनाचे प्रवेशिकांचे परीक्षण सुरेखा दुबे, रितेश निमसडे, चित्रकला स्‍पर्धेतील प्रवेशिकांचे परिक्षण सुनील रहाटे,श्रीमती वैशाली वा. सावंत, राजेंद्र लांजेवार यांनी केले. वक्‍तृत्‍व स्‍पर्धेच्‍यावेळी परीक्षक म्‍हणून डॉ.प्रवीण वानखडे व श्रीमती डॉ. सुनिता भोईकर, सुषमा पाखरे यांनी केले.
             कार्यक्रमाचे  प्रास्‍ताविक पी.एच. बडगे यांनी केले. आभार बी.डी. खडतकर यांनी मानले. के. वाय.तळवेकर, व्‍ही.डी. गभणे, शीतल ए.राठोड, बी.जी.राठोड, बी.बी. फटांगरे, श्रीमती शिला काबंळे, ए.आर. कावळे, ए.बी. वंजारी, मधुकर गायकवाड, रुपचंद चोपडे आदींनी पुढाकार घेतला.
                                                                      000000  

No comments:

Post a Comment