Friday 5 February 2016

लघु उद्योजकांनी जिल्‍हा पुरस्‍कारासाठी
22 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
       वर्धा दि. 5- महाराष्‍ट्र राज्‍य उद्योग संचालनालयामार्फत लघु उद्योजकांसाठी जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हा पुरस्‍कार योजना दरवर्षी राबविण्‍यात येते. सन 2015 या वर्षात वर्धा जिल्‍ह्यात उल्‍लेखनीय कामगिरी करणा-या उत्‍कृष्‍ट लघु उद्योजकांकरिता ही योजना राबविण्‍यात येत आहे. विहित नमुन्‍यात दिनांक 22 फेब्रुवारीपर्यंत जिल्‍ह्यातील सर्व लघु उद्योजकांनी अर्ज करावा. विहित नमुन्‍यातील अर्ज जिल्‍हा उद्योग केंद्र, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.
      या योजनेचा मुख्‍य उद्देश नवीन लघु उद्योजकांना प्रेरणा व उत्‍साह निर्माण करुन उद्योजकाच्‍या आवश्‍यक गुणाचा विकास करणे हा आहे.  या योजने अंतर्गत जिल्‍हास्‍तरावर दोन पात्र उद्योजकांची निवड करण्‍यात येईल, याकरीता प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
          प्रथम पुरस्‍कार रु. 15 हजार रुपयांच्या नगदी रक्‍कमेसह मानचिन्‍ह, द्वितीय पुरस्‍कार     रु.10 हजार रुपये नगदी रक्‍कमेसह मानचिन्‍ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. उद्योजकांना स्‍थायी लघु उद्योग नोंदणी  दिनांक 31 डिंसेबर 2011 किंवा त्‍यापूर्वी मिळाली आहे व ज्‍याचे उत्‍पादन सतत दोन वर्षांपासून चालू आहे, अशांनाच या योजनेचा लाभ देता येईल.
          ज्‍या लघु उद्योजकांना पूर्वी जिल्‍हा, राज्‍य व राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळालेला आहे अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्जदार लघु उद्योजक कोणत्‍याही बँकेचा थकबाकीदार नसावा,असेही कळविण्यात आले आहे.
0000000


No comments:

Post a Comment