Sunday 27 January 2013

माहिती तंत्रज्ञान उद्योगांच्‍या विकासाला चालना देणार -राजेंद्र मुळक


                    *वर्धा आयटी पार्कचे भूमिपूजन
                   *37 ऐकरमध्‍येअत्‍याधुनिक सुविधेसह आयटी पार्क
                   * विमाणतळ उभारण्‍याची मागणी
वर्धा दि.27- माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्‍या विकासाला चालणा देण्‍याचे धोरण राज्‍यशासनाने नवीन औद्योगिक धोरणानुसार स्विकारले असून वर्धा आयटी पार्कच्‍या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्‍यातयेईल अशी ग्‍वाही पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
          सी.दास ग्रुपतर्फे महाराष्‍ट्र औद्योगिक विकास क्षेत्रात 37 एकर जागेवर उभारण्‍यातयेणा-या वर्धा आयटी पार्कचे भुमिपुजन पालकमंत्री राजेंद्र मुळक यांचेहस्‍तेझाले त्‍याप्रसंगी आयोजितकार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलतहोते.कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी खासदार दत्‍ता मेघे होते तर प्रमुख पाहुने म्‍हणून नगराध्‍यक्षआकाश शेंडे,जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना,एम.आय.डी.सी. असोशिएशनचे प्रविण हिवरे,सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्षमा.म.गडकरी ,सी.दास. उद्योगसमुहाचे बी.आर.भाटीया, बिपीन भाटीया व कुणाल भाटीया तसेच आकाश शेंडेव्‍यासपिठावर होते.
          वर्धा जिल्‍ह्यामध्‍ये माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्‍या उभारणीमुळे विकासाचे नवे दालन सुरु होतअसल्‍याचे सांगतांना पालकमंत्री राजेंद्र मुळक म्‍हणाले की, मिहान प्रकल्‍पाच्‍या उभारणीला गती देण्‍यातआली असून आय.टी. क्षेत्रातील मान्‍यवर कंपन्‍या येथेउद्योग सुरु करीत असून याचा लाभ वर्धा आयटी पार्कलाही होणार आहे. या परिसरातील उच्‍च शिक्षीत युवकांना या पार्कमुळे रोजगाराच्‍या मोठ्या संधी उपलब्‍ध होणार आहे.
          जीटीएस सारखी नवीन कर प्रणाली देशात लागूहोत असून उद्योजक व या क्षेत्रातील घटकांना आता दळण-वळणाच्‍या सुविधा असलेल्‍या केंद्रामध्‍येउद्योग उभारणे सुलभ होणार आहे.याचा लाभ देशाच्‍या मध्‍यवर्ती असलेल्‍या वर्धा वनागपूर शहरास निश्चितच होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
          अध्‍यक्षीय भाषणात खासदार दत्‍ता मेघे यांनी वर्धा जिल्‍ह्यातऔद्योगिक विकास होत असतांनाच विमानतळ निर्माण करण्‍यासाठी तात्‍काळ निर्णय घ्‍यावा व येथे हेलिकॅप्‍टरसह इतर छोटी विमाने उद्योजकांच्‍या सुवेधेसाठी उतरण्‍याची सुविधा असावी अशी मागणी यावेळी केली. वर्धा आयटी पार्कमध्‍ये देशातील महत्‍वपूर्ण उद्योजक गुंतवणूक करतील असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
          यावेळी जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना,एमआयडीसी असोसिएशनचे अध्‍यक्ष प्रविण हिवरे यांनीही मार्गदर्शन केले.
          प्रारंभी सी.दास ग्रुपचे प्रमुख बी.आर.भाटीया यांनी स्‍वागत करुण प्रास्‍ताविकात वर्धा आयटी पार्कमधील सुविधाबाबत माहिती दिली. कुणाल भाटीया यांनी वर्धा जिल्‍ह्यातउपलब्‍ध असलेल्‍या तांत्रिक तसेच बौधीक संपदेची माहिती दिली. शेवटी बिपीन  भाटीया यांनी आभार प्रदर्शन केले.
00000

No comments:

Post a Comment