Thursday, 22 November 2012

ग्रामपंचायत निवडणूकीची आचार संहिता लागू



वर्धा दिनांक 22-  जिल्‍ह्यात  जानेवारी  ते मार्च पर्यंत  मुदत संपत असलेल्‍या तीन ग्रामपंचायत व सात ग्रामपंचायत पोट निवडणूकीसाठी  राज्‍य   निवडणूक  आयोगाने  निवडणूकीचा   कार्यक्रम  जाहीर केला असून, ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता  लागू झाली असल्‍याची  माहिती  जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना यांनी  आज दिली.  
            जिल्‍ह्यातील   तीन ग्रामपंचायती च्‍या सार्वत्रिक निवडणूका व सात पोटनिवडणूका  23 डिसेंबर रोजी  होणार आहेत.  त्‍यामुळे  याच ग्रामपंचायतींच्‍या  क्षेत्रात  तसेच संबधीत प्रभागाच्‍या  क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्‍यात आली आहे. आचारसंहिता   निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत  अस्तित्‍वात  राहील.  आचारसंहितेचा भंग होणार नाही याची  दक्षता  घ्‍यावी  असे आवाहनही  जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment