वर्धा, दि. 21- सामान्य
जनतेमध्ये वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याबाबत आस्था निर्माण व्हावी आणि
याबाबत जिल्ह्यात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे त्यांच्या कार्याचा
गौरव व्हावा या उद्देशाने वनश्री पुरस्कार शासनाकडून देण्यात येतो.
त्यानुसार वनेत्तर
क्षेत्रात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन या कामांमध्ये उत्कृष्ट कामगिरी
बजाविणा-या व्यक्ति व संस्था यांना दरवर्षी वनश्री पुरस्कार देवुन गौरविण्यात येत असते. दिनांक 27 जुन 2011 च्या शासन
निर्णयानुसार आता या पुरस्काराचे नावात बदल करुन ते छत्रपती शिवाजी महाराज वनश्री
पुरस्कार करण्यात आले आहे.
यापूर्वी देण्यात आलेल्या पुरस्काराच्या धर्तीवरच सन 2011 करीता छत्रपती
शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देणेकरीता
वनेत्तर क्षेत्रावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे कामात कार्यरत असणा-या व्यक्ति
व संस्थाकडून प्रधान मुख्यवनसंरक्षक व
महासंचालक, सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामार्फत
प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
या अंतर्गत देण्यात येणारे पुरस्कार महसुल
विभाग स्तर आणि राज्यस्तर अशा दोन वेगवेगळ्या स्तरावर देण्यात येतात. प्रत्येक
स्तरावर व्यक्ती , ग्रामपंचायत , शैक्षणिक संस्था , सेवाभावी संस्था, ग्राम,
विभाग किंवा जिल्हा अशा पाच वेगवेगळ्या संवर्गात पुरस्कार देण्यात येतात. महसुल
विभाग स्तरावर वरील प्रत्येक संवर्गात दोन
पुरस्कार देण्याची तरतुद असुन प्रथम पुरस्कार रुपये 25000 तर व्दितीय
पुरस्कार रुपये 15000 रक्कमेचा आहे. राज्यस्तरावर वरील प्रत्येक
संवर्गात तीन पुरस्कार देण्याची तरतुद आहे. यापैकी प्रथम पुरस्कार रुपये 50,000, व्दितीय पुरस्कार
रुपये 40,000 तर तृतीय पुरस्कार रुपये 30,000 असे दिल्या जाणा-या पुरस्कारांचे
स्वरुप आहे.
पुरस्कार मिळण्यासाठी इच्छुक असणा-या व्यक्ति,
ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था व सेवाभावी संस्था यांनी रोपवाटिका व
रोपनिर्मितीचे काम केलेले असावे. त्यांनी शासकीय किंवा सामुहिक अथवा खाजगी जमिनिवर सरपन किंवा
वैरण देणा-या झाडांची लागवड केलेली असावी. त्यांनी वृक्ष अलागवडीचे कार्यक्रमात ग्रामीण
दुर्बल घटकांचा तसेच महीलांचा सहभाग
घेतलेला असावा. त्यांनी वनीकरणाच्या माध्यमातुन शाळकरी विद्यार्थी व महिला
यांचे कल्याणार्थ कार्य केलेले असावे, अपारंपारीक उर्जा सत्रोतांचा वापर करणेसाठी
जनतेला प्रोत्साहीत किंवा प्रवृत्त करणारे त्यांचे काम असावे, वनीकरणाच्या
संबधात जनजागृती किंवा प्रसिध्दी व प्रेरणा देणेबाबत सुध्दा काम त्यांनी केलेले
असावे.
जिल्ह्यात वनेत्तर
क्षेत्रात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्या कार्यात दिनांक 31 डिसेंबर 2011 पर्यंत मागील 3
वर्षापासून कार्यरत असणा-या आणि या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास इच्छुक
असणा-या व्यक्ति, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था व सेवाभावी संस्था यांनी जास्तीत
जास्त संख्येत प्रस्ताव सादर करण्यासाठी नागरिकांना आणि संस्थांना उपसंचालक,
सामाजिक वनीकरण विभाग वर्धा यांचेकडून करण्यात येत आहे. परिपुर्ण प्रस्ताव सादर
करणेसाठी प्रस्तावाचा नमुना आणित्या अनुषंगाने
आवश्यक माहिती प्राप्त करुन घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील व्यक्ति, शैक्षणिक संस्था, सेवाभावी
संस्था, ग्रामपंचायत इत्यादी यांनी उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा यांचे
बॅचलर रोड स्थित कार्यालय आणि तालुक्याचे मुख्यालयी असलेल्या लागवड अधिकारी
यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याची विनंती उपसंचालक, सामाजिक
वनीकरण विभाग वर्धा यांचेकडून करण्यात येत
आहे.
या
पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास इच्छुक असणा-या व्यक्ति किंवा संस्था
यांनी त्यांचा विहीत प्रपत्रातील प्रस्ताव योग्य पुर्ततेसह दिनांक 31 ऑगस्ट
2012 पर्यंत उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा यांचेकडून करण्यात येत आहे.
000000
No comments:
Post a Comment