Saturday 16 June 2012

बालकामगार प्रथा मुक्‍तीकरिता लोकसहभाग हवा

             वर्धा दि.16- बालके ही राष्‍ट्राची संपत्‍ती आहे, देशाचा भावी आधारस्‍तंभ आहे. त्‍यांच्‍यावर देशाचे भवितव्‍य अवलंबून आहे. बालकांना सुदृढ बनविणे ही समाजातील प्रत्‍येक घटकांची जबाबदारी नव्‍हे तर आद्यकर्तव्‍य आहे. आज आपण पाहतो की अल्‍प वयात मुले प्रौढासारखी किंबहुना त्‍याहून अधिक काम करतांना आढळतात. बालकामगार ही समाजातील अत्‍यंत क्रूर व अनिष्‍ट प्रथा आहे.बालकामगारांना शिक्षणाच्‍या माध्‍यमातून मुक्‍त प्रवाहात आणून वर्धा जिल्‍हा बालकामगार मुक्‍त करण्‍यासाठी विविध उपक्रम सुरु आहेत.
   जागतिक बालकामगार विरोधी दिन सर्वत्र साजरा करण्‍यात येतो त्‍यानिमित्‍य कामगार अधिकारी कार्यालय, वर्धा जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्‍हा सामाजिक न्‍याय प्राधिकरण यांच्‍या विद्यमाने शासकीय मुलांचे निरिक्षण गृह केळकर वाडी येथे विशेष कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुने म्‍हणून न्‍यायमूर्ती  स.मा. येलट्टी ,जिल्‍हा महिला व बालविकास अधिकारी मनीश कुरसंगे, अॅड. वंदना काकडे यांची यावेळी उपस्थित होते.
समाजात बालमजुरी निर्मुलनाचे वातावरण निर्माण करण्‍याचे काम शासन करीत असून यासाठी समाजाची माणसीकता व सर्व सामान्‍याचे लक्ष या समस्‍येकडे केंद्रीत केले गेले तर समस्‍येचे निर्मुलन करण्‍यात निश्चितपणे यश मिळेल असा विश्‍वास कामगार अधिकारी स.मा.धुर्वे यांनी व्‍यक्‍त केला.
          समाजातील सर्व स्‍तरातील नागरीक, सामाजिक संस्‍था,प्रसारमाध्‍यम यांनी या कार्यास सहकार्य करावे असे आवाहन न्‍यायमूर्ती.येलट्टी यांनी केले.
          जागतिक कामगार विरोधी दिनाचे औचित्‍य साधून सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत शहरातील विविध उपहारगृह, रेस्‍टारेंट व इतर काही ठिकाणी मालकांनकडून आमच्‍याकडे बालकामगार काम करीत नाही आणि यापुढे ठेवणार नाही असे हमीपत्र लिहून घेण्‍यात आले.
         विविध ठिकाणी भित्‍तीपत्रके वितरीत करण्‍यात आली. फक्‍त एक तास बाल‍मजुरी विरुध्‍द अभियान राबविण्‍यात आले. जिल्‍हा कृती दलामार्फत विविध धोकादायक उद्योगावर छापे घालण्‍यात आले.
00000

No comments:

Post a Comment