Thursday 14 June 2012

शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम जिल्‍हयात 17 लाख 80 हजार वृक्ष लावणार श्रीमती जयश्री भोज


                                        

            वर्धा दि. 13- शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत जिल्‍हयात 17 लाख 80 हजार वृक्ष लावण्‍यात येणार असून वृक्ष लागवड कार्यक्रमास सामाजीक व शैक्षणिक संस्‍थांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.
          जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात आत्‍मा जिल्‍हा नियामक मंडळाची बैठक जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्‍या बोलत होत्‍या.
         शतकोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जिल्‍हयात प्रभाविपणे राबविण्‍यात येणार असून वृक्ष लागवड अभियान ही लोक चळवळ व्‍हावी यासाठी मोठया प्रमाणात जागृती मोहीम राबविण्‍यात येणार असल्‍याची माहितीही श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
          शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत जिल्‍हयाला 17 लाख 80 हजार वृक्ष लागवडीचे उदिष्‍ट देण्‍यात आले असून वर्धा तालुका पातळीवर या मोहिमे अंतर्गत वृक्ष लागवड करण्‍यात येणार आहे. वर्धा तालुक्‍यासाठी 1 लाख 9 हजार 412  वृक्ष लागवड करण्‍यात येणार असून सेलू, देवळी व आर्वी तालुक्‍यात प्रत्‍येकी 2 लाख 8 हजार, आष्‍टी तालुक्‍यासाठी 1 लाख 4 हजार 706, कारंजा 2 लाख 9 हजार 412, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यासाठी प्रत्‍येकी 3 लाख 14 हजार 117 वृक्ष लागवडीचे उदिष्‍ट देण्‍यात आले आहे.
          कृषी विभाग, सामाजीक वणीकरण,वन तसेच विविध विभगाच्‍या समन्‍वयाने वृक्ष लागवड मोहीम यशस्‍वी करण्‍यात येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी कृषी विभागाच्‍या 7 रोप वाटिकेत 7 लाख 50 हजार रोपे तयार आहेत.तसेच किसान नर्सरी, सामाजीक वनीकरण व वन विभागाच्‍या रोप वाटीकेमधून उपलब्‍ध होणारे सर्व रोपे वृक्ष लागवड अभियाना अंतर्गत जिल्‍हयात लावण्‍यात येणार असल्‍याची माहितीही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
        यावेळी अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस.ब-हाटे, जिल्‍हा कृषी अधिकारी आर.व्‍ही. बायकवाड, डी.के. जेरापूरकर, आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment