वर्धा दि.11- तुषार संचाचा
शेतात वापर करीत असतांना या संचातील दाब 2 केजी ठेवणे,सोयाबीनची पट्टा पेरणी पध्दतीचा
वापर वेगवेगळया पिकाच्या आवश्यकतेनुसार
द्यावयाच्या पाण्याचे प्रमाण व त्यानुसार तुषार संच चालविण्याचा कालावधी तसेच
त्याच पाण्यामध्ये गहू,हरभरा व कांदा या पिकांना नेमकी पाण्याची गरज याचे
नियोजन करुन शेतक-यांनी फायदेशिर शेती करावी असा हितोपदेश राहुरी येथील प्रगतीशिल
शेतकरी डॉ. दतात्राय वने यांनी दिला.
येथील विकास भवन येथे आत्मा अंतर्गत
जिल्हयातील निवड केलेल्या कृषी मित्राची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली त्याप्रसंगी
ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, नागपूर
येथील कृषी महाविद्यालयाचे डॉ.व्ही. व्ही. पत्तीवार, किटक नाशक तज्ञ डॉ. लक्ष्मीकांत
पेशकर आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
पिकासाठी पाण्याचे नियोजन केल्यास 33
टक्के होणारी पाण्याची बचत व उत्पादनात होणारी वाढ याबाबत स्वतःचा अनुभव कथन
करुन डॉ. वने म्हणाले की, शेतीचा ताळेबंध ठेवणे,काळाजी गरज असून शेती करीत
असतांना पाळावयाची पथ्थे तसेच
प्राथमिक गरजा सिमीत ठेवणे यातून
स्वतःला घडविणे आदिबाबत मार्गदर्शन करुन कृषी विद्यालयाचे संशोधित झालेले
तंत्रज्ञान गरजू शेतक-यापर्यन्त झापाट्याने व परिनामकारक पध्दतीने पोहचविण्यासाठी
कृषी मित्र व कृषी विभागाची भुमीका ही
महत्वपूर्ण ठरत आहे.असे त्यांनी यावेळी सांगीतले.
याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
भाऊसाहेब ब-हाटे यांनी आत्मा संकल्पना व प्राप्त परिस्थिती व त्याचे महत्व
शेतकरी गट संघटन पिकानुसार शेतक-यांचे समह स्थापन करणे त्यावर त्यांना पिकाच्या
असलेल्या समस्यानुसार प्रशिक्षण, प्रात्याक्षिके व सहली यांचे तालुकास्तरावरील
समितीव्दारे प्राथमिक नियोजन करुन प्रस्तावित करणे व त्याला जिल्हास्तरावरील
मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आत्मा नियामक मंडळाखाली बैठकीमध्ये मान्यता
घेवून राबविण्याची कार्यपध्दती सांगीतली तसेच गेल्यावर्षी आत्मा अंतर्गत
निर्माण झालेल्या यशोगाधा यामध्ये संत्रा पिकाचे आंबीया बहार घेणे, कपाशीवरील
लाल्या नियंत्रण करणे, रब्बी हंगामात ज्वारी उत्पादन करणे, यांत्रिकीपध्दतीने
कापूस वेचणी करणे, सामुहिक पध्दतीने कमी खर्चाचे शेताला कुंपन करुन जंगली प्राण्याव्दारे
जिल्हयात उत्पन्न झालेली समस्या बाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी डॉ.व्ही.व्ही. पत्तीवार ,
यांनीही कापूस पिकाच्या बाबतीमध्ये
सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमाला वर्धा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व
माजी कृषी सभापती सुनिल राऊत यांनी
संबोधित करतांना असे सांगितले की विदर्भामध्ये पाणी,जमीन मुबलक असून त्याव्दारे
शास्त्रिय पध्दतीने शेती करणे आवश्यक झाले असून वेळोवेळी कृषी विभागाचे
मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे असे आर्वजून सांगितले.यावेळी डॉ.लक्ष्मीकांत पेशकर
यांनी ऐकात्मीक कीड नियंत्रण पध्दतीने कीड नियंत्रणाबाबत तसेच मित्र व शत्रूकिडीची ओळख करुन घेणेबाबत व
शास्त्रिय पध्दतीने किटकनाशकाचा वापर करुन उत्पादन खर्च कमी करण्यासाठी
शेतक-यांना हितोपदेश केले.
या कार्यक्रमामध्ये शेतकरी काशिनाथ
राउत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविन्द्र धर्माधिकारी, यांनी
केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडू यांनी केले.कार्यक्रमाचे आभार उपविभागीय कृषी
अधिकारी जेजूरकर यांनी मानले.
000000
No comments:
Post a Comment