वर्धा, दि.27- सामाजिक न्याय विभागामार्फत मातंग समाजातील कलावंत व समाज सेवक यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार व्यक्ती व संस्था अशा दोन गटात देण्यात येतो.
पुरस्काराचे स्वरुप व्यक्तिगत पुरस्कार 15,000 रुपये रोख व सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह तसेच संस्थात्मक पुरस्कार 25,000 रुपये रोख व सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येतो.
व्यक्तिगत पुरस्कारासाठी अर्जदार व्यक्तीने मातंग समाजाकरीता समाज कल्याण कलात्मक व साहित्यिक क्षेत्रात किमान 10 वर्ष कार्य केलेले असावे. अर्जदार पुरुषाचे वय किमान 50 वर्षे व स्त्रियांचे किमान 40 वर्षे इतके असावे. पुरस्कारासाठी मातंग समाजातील व्यक्तीचाच विचार करण्यात येईल.
संस्थात्मक पुरस्कारासाठी संस्था नोंदणीकृत असावी. स्वयंसेवी संस्थेने समाज कल्याण क्षेत्रात मातंग समाजाच्या उन्नतीसाठी अन्याय निर्मूलन, अंधश्रध्दा निर्मूलन इत्यादी क्षेत्रात किमान 10 वर्षे काम केलेले असावे. स्वयंसेवी संस्था राजकारणापासून अलिप्त असावी.
अटी व शर्ती पूर्ण करणा-या व्यक्ती व संस्थानी विहीत नमून्यातील अर्ज तीन प्रतीत दिनांक 15 एप्रिल 2012 पूर्वी कार्यालय सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड, हिम्मतसिंगका विद्यालय जवळ वर्धा येथे अर्ज नमुना व अधिक माहितीसाठी कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा.
000000
No comments:
Post a Comment