Monday 19 December 2011

फळबाग लागवड विकास कार्यक्रम


     वर्धा,दि.19-राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत फळबाग लागवड विकास कार्यक्रम सन 2011-12 या आर्थीक वर्षात जिल्‍ह्यात 90 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड करण्‍याचे लक्षांक प्राप्‍त  झाले आहे. पपई 50 हजार हेक्‍टर व केळी (टिश्‍यू कल्‍चर 40 हेक्‍टर  क्षेत्रावर लागवड करावयाचे आहे. पपई या पिकासाठी हेक्‍टरी एकूण 30 हजार रुपये व केळी फळपिकांसाठी हेक्‍टरी एकूण 41 हजार रुपये अनुदान दोन वर्षात देय राहील.

     योजने अंतर्गत लाभार्थ्‍यांची निवड, लागवड क्षेत्र मर्यादा, तांत्रीक मंजूरी, प्रशासकीय मंजूरी लाभार्थीच्‍या जबाबदा-या व इतर सर्व निकष रोजगार हमी योजना फळबाग लागवडीचे शासन निर्णयाप्रमाणे राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी रासायनिक खते. रोपसंरक्षण औषधे, शेतक-यांनी स्‍वतः खरेदी केल्‍यास खरेदीची पावतीची नोंद घेऊनच अनुज्ञेय अनुदान अदा करण्‍यात येईल. साहित्‍य खरदेी संबधीच्‍या पावत्‍या संबधीत कृषि सहाय्यक यांचेकडे देण्‍यात याव्‍यात. अधिक माहितीसाठी संबधीत तालुका कृषि अधिकारी,मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा व राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान योजनेच्‍या जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी लाभ घेण्‍याचे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment