वर्धा,दि.23-जिल्ह्यात सर्व शेतक-यांना सुचित करण्यात येते की, मागील जानेवारी 2011 पासुन जिल्ह्यात कृषि विभागा मार्फत जुलै 2008 ते ऑक्टोंबर 2010 या कालावधीत झालेल्या नैसर्गीक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले अशा 50 टक्के चे वर नुकसान झालेल्या क्षेत्राला मदत वाटपाची कार्यवाही सुरु आहे. जुलै 2008 ते ऑक्टोंबर नोव्हेंबर 2010 या कालावधीत नैसर्गीक आपत्तीमुळे 57074.18 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 50 टक्के चे वर नुकसान झाले त्या करीता रुपये 27.26 कोटी रुपयाची वाटपा करीता आवश्यकता असताना शासनाकडून आतापर्यंत जिल्ह्याला वाटपा करीता रुपये 26.31 कोटी रुपये प्राप्त झालेत व प्राप्त रक्कमेपैकी दिनांक 15 डिसेंबर 2011 पर्यंत रुपये 23.83 कोटी मदत निधीचे वाटप 144723 शेतक-यांना झाले आहे. प्राप्त निधीपैकी अजुनही जवळपास रुपये 2.48 कोटी निधीचे वाटप होणे बाकी आहे.
ब-याचशा शेतक-यांची जमीन गावात असते परंतु शेतकरी शहरात राहत असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे त्यांचे बँक खाते क्रमांक संबंधित तालुका कृषि अधिकारी यांना न मिळाल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम त्यांचे बँक खात्यात जमा करता आली नाही किंवा काही शेतक-यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक तालुका कृषि अधिकारी कार्यालयास दिले परंतु मागील बरेच वर्षापासून त्या खात्यात व्यवहार होत नसल्यामुळे खाते रद्द झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मोठी रक्कम वाटपा अभावी शिल्लक आहे.
जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना आवाहन करण्यात येते की ज्या शेतक-यांच्या शेती पिकाचे जुलै 2008 ते ऑक्टोंबर नोव्हेंबर 2010 या कालावधीत 50 टक्के चे वर नुकसान झाले व ज्यांची नांवे सर्व्हेक्षण अहवाल आहे अशा शेतक-यांनी तात्काळ नजिकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी किंवा गावच्या कृषि सहाय्यकाशी दिनांक 31 डिसेंबर 2011 पर्यंत संपर्क करुन आपले बँक खाते पासबुक दाखवुन खाते नंबर नोंद करावा म्हणजे त्यांचे खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करता येईल.दि. 31 डिसेंबर 2011 पर्यंत राहिलेले वाटप पुर्ण करुन शिल्लक राहणारी रक्कम शासनास परत करण्यात येईल. त्यानंतर येणा-या शेतक-यांचा हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment