Wednesday 21 December 2011

गांधी ; जनसंपर्काच्‍या यशाचे ब्रांडिंग मॉडेल


पब्लिक रिलेशन्‍स सोसायटी ऑफ इंडियाच्‍या वतीने येत्‍या 23-25 डिसेंबर दरम्‍यान नागपूर आणि वर्धा येथे 33 व्‍या अखिल भारतीय जनसंपर्क संमेलनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. वर्धा येथे 24 रोजी महात्‍मा गांधी आणि जनसंपर्क या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्‍यात आले आहे. या आयोजनाविषयी सांगाताहेत महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बी.एस.मिरगे.                                                        

महात्‍मा गांधी यांना केवळ राजकीय चष्‍म्‍यातून बघणे, त्‍यांच्‍या  व्‍यक्तित्‍व आणि कृतित्‍वाच्‍या इतर आयामांपासून अनभिज्ञ राहणे होय. एवढी वर्ष लोटल्‍यानंतर सुध्‍दा त्‍यांच्‍या व्‍यक्तित्‍वाच्‍या विशाल वटवृक्षाचे बरेच असे पैलू आहेत ज्‍याच्‍याशी अजून स्‍पर्शही झाला नाही. ते शोधणे, जाणून घेणे आणि त्‍यांचे मूल्‍यांकन करणे वर्तमान संदर्भात प्रासंगिक होत चालले आहे. गांधी विचार वाडःमयातून बरेच काही देशाने  आणि जगाने घेतले आहे.
आज जन-समन्‍वयात आलेली घसरण यामुळे गांधींच्‍या विशाल जनसंपर्काला विचारात घेण्‍याची आवश्‍यकता वाटत चालली आहे. जन-भागिदारी, जन-समन्‍वय किंवा जन-संपर्काच्‍या शिवाय बहुआयामी कार्याचे यश असंदिग्‍धच वाटते.
     गांधी आपल्‍या व्‍यक्‍तीमत्‍वात आणि आपल्‍या कर्मात समन्‍वय, सहयोग आणि जन-संपर्क या सूत्राचे उदाहरण बनले होते. असे नसते तर गांधी एवढ्या मोठ्या  जगासाठी यशाचे मानक उदाहरण झाले नसते. त्‍यांचा समन्‍वय, सहयोग आणि संपर्क हा एक ब्रांड झाले होते. आजच्‍या वैश्र्विकरणाच्‍या काळात त्‍यांचा तो समन्‍वयधर्मितेचा जनसंपर्क आवश्‍यक वाटू लागला आहे आणि काही अंशी तो स्‍थापितही झाला आहे.

     जनसंपर्काची भूमिका एक ब्रांड रोल प्रमाणे विविध कार्याच्‍या यशात सहयोगी होत असते. ही संकल्‍पना केंद्रस्‍थानी ठेवून 33 व्‍या अखिल भारतीय जनसंपर्क संमेलनाच्‍या  नागपुर चॅप्‍टरने आपल्‍या चर्चेचा विषय `रोल ऑफ पब्लिक रिलेशन्‍स इन ब्रांडिंग `असा ठेवला आहे. या संमेलनात जनसंपर्क, पत्रकारिता आणि जाहिरात या त्रयींची तारतम्‍यता कोणत्‍याही ब्रांडला व्‍यावहारिक ठरविते, यावर विशेष चर्चा होणार आहे.
     पब्लिक रिलेशन्‍स सोयटी ऑफ इंडियाच्‍या नागपूर चॅIप्‍टरने 232,24 आणि 25 डिसेंबर असे तीन दिवस हे आयेाजन केले आहे. यापेकी 24 डिसेंबर रोजी वर्धा येथील महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात गांधीजींचा जनसंपर्क या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले आहे.
     हे आयोजन महात्‍मा गांधींच्‍या जनसंपर्काचा व्‍यापक आणि संमेलनाच्‍या महत्‍वाच्‍या उद्देशांची पूर्तता करण्‍याचाच एक भाग होय. इथे हे सांगणे महत्‍वाचे वाटते की वर्धा ही संतांची अशी कर्मभूमी आहे. जेथून गांधीजींनी स्‍वातंत्र्याच्‍या यशासाठी जनसंपर्काच्‍या माध्‍यमातून देशाला एक ब्रांड दिला होता. महानगर मुंबईला जावून त्‍यांनी `डू ऑर डाय`चा नारा दिला होता आणि हाच ब्रांड पुढे जावून यशाचा सूत्रधार ठरला होता.
     संमेलनाच्‍या या महत्‍वाच्‍या श्रृंखलेत महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाने ` गांधीजींची पत्रकारिता आणि वर्तमान संदर्भ` या विषयावर दि. 21 डिसेंबर 2011 रोजी एक निबंध स्‍पर्धा आयोजित केली होती.

     हे आयोजन संमेलनाच्‍या  त्रिदिवसीय श्रृंखलेत महत्‍वाचे यासाठी आहे की गांधीजींच्‍या पत्रकारितेची मिशनरी भावना आजच्‍या बांडिंग मीडियातही प्रतिध्‍वनित होत आहे. अशाप्रकारे हे संमेलन ब्रांड आणि व्‍यवहार यांची आधारशीला स्‍थापित करणार असे म्‍हटले तर अतिशयोक्‍ती होणार नाही.

No comments:

Post a Comment